शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी पलूसला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST

पलूस : पलूस तालुक्यात महापुराला दीड महिना उलटून गेला तरी शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान व नुकसानभरपाई दिलेली नाही. तातडीने ...

पलूस : पलूस तालुक्यात महापुराला दीड महिना उलटून गेला तरी शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान व नुकसानभरपाई दिलेली नाही. तातडीने मदत करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपच्या वतीने मंगळवारी पलूस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला.

पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांचा आक्रोश राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोर्चा काढला आहे. भाजप आंदोलनाच्या पायावर आजपर्यंत वाढत आली आहे. साहजिकच आंदोलने राज्यकर्त्यांच्या विरोधात असतात. त्यामुळे आंदोलनाला मिळालेला तरुणांचा पाठिंबा आगामी काळात सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो.

संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराच्या काळातील पूरग्रस्तांना अजूनही शासकीय मदत मिळालेली नाही. यावरूनच आघाडी सरकारचा पूरग्रस्तांविषयी असलेला खोटा कळवळा सिद्ध होतो. देवेंद्र फडणवीस सरकारने पूरग्रस्तांना दुसऱ्याच दिवशी मदत देऊन त्यांचे संसार सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मागील पुरात जे विरोधी बाकावर बसून भाजपच्या विरोधात ढोल पिटत होते, ते आता आघाडी सरकारमध्ये आहेत. तरीही पूरग्रस्त कुटुंबांना मदत मिळत नाही. अशा लोकप्रतिनिधींना जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ताबडतोब मदत करा, अन्यथा किंमत मोजावी लागेल.

सकाळी अकरा वाजता मोर्चा सुरू झाला. भाजप जनसंपर्क कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंतचा परिसर आंदोलनाचाच माहोल दिसत होता. भाजपचे झेंडे घेऊन दुचाकीवरून फिरणारे तरुण घोषणा देत होते. ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ ही प्रमुख घोषणा होती. पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे, या मागणीचेही फलक घेऊन ते घोषणा देत होते. मोर्चामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय दिसला.

140921\1952-img-20210914-wa0011.jpg

मोर्चा