शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पूरसंरक्षक भिंतींमुळे मिळाला पलूसला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 19:24 IST

कृष्णा नदीकाठी असणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीमुळे यंदाच्या महापुरात काहीसा दिलासा मिळाला. ज्या भागात या भिंती बांधण्यात आल्या आहेत, त्या भागातून नदीचा मुख्य प्रवाह येतो. या प्रवाहाची तीव्रता या पूरसंरक्षक भिंतींमुळे काहीअंशी कमी झाली.

ठळक मुद्देया भिंती असलेल्या ठिकाणी नदीकाठाची फारशी हानी झाली नाही.

अशुतोष कस्तुरेपलूस : पलूस तालुक्यामध्ये २००५ मध्ये आलेल्या महापुरामध्ये मोठी हानी झाली. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका ओळखून तत्कालीन पुनर्वसन व मदतकार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने, नदीकाठची जमीन वाहून जाऊ नये, यासाठी तालुक्यात गावोगावी पूरसंरक्षक भिंती उभारण्यात आल्या. यंदा पाण्याचा प्रचंड विसर्ग होऊनही या भिंतींच्या परिसरातील मंदिरे, स्मशानभूमी सुरक्षित राहिल्या.

कृष्णा नदीकाठी असणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीमुळे यंदाच्या महापुरात काहीसा दिलासा मिळाला. ज्या भागात या भिंती बांधण्यात आल्या आहेत, त्या भागातून नदीचा मुख्य प्रवाह येतो. या प्रवाहाची तीव्रता या पूरसंरक्षक भिंतींमुळे काहीअंशी कमी झाली. पलूस तालुक्यात आमणापूर, बुर्ली, दह्यारी, भिलवडी, धनगाव, नागठाणे, औदुंबर, खोलेवाडी, राडेवाडी या गावांमध्ये पूरसंरक्षक भिंती उभारल्या आहेत. या भिंतींमुळे कृष्णा नदीचा प्रवाह वेगवान असूनही नदीकाठची मंदिरे, इमारती, स्मशानभूमीस धोका पोहोचला नाही.

कृष्णा नदी पलूस तालुक्यात तुपारीपासून दक्षिणवाहिनी आहे. दह्यारी, घोगाव, दुधोंडीपर्यंत ती छोटी वळणे घेत येते. येथून पुढे पुणदी, नागराळे, बुर्ली, संतगाव, शिरगाव, बहे, नागठाणे येथे ती मोठी वळणे घेते. नंतर धनगाव, अंकलखोप, औदुंबर येथे पश्चिमेकडे वाहते. भिलवडीला वळसा घालत चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रह्मनाळपर्यंत ती पुन्हा पूर्वेकडे वाहते. प्रत्येक वळणावर तिच्या प्रवाहाचा वेग वाढतो. त्यामुळे या वळणावर असलेल्या गावांना पुराच्या कालावधीमध्ये वाढलेल्या प्रवाहाचा तडाखा बसतो. याच बाबी लक्षात घेऊन डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने २००५ च्या महापुरानंतर गावोगावी पूरसंरक्षक भिंती उभारण्यात आल्या. या भिंती असलेल्या ठिकाणी नदीकाठाची फारशी हानी झाली नाही. परंतु जेथे भिंती नाहीत, तेथे नदीकाठच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे.

पलूस तालुक्यात ज्या ठिकाणी पूरसंरक्षक भिंती व बंधारे बांधण्यात आले आहेत, त्या भागात बहुतांश धार्मिक स्थळे किंवा स्मशानघाट आहेत. भिंतींमुळे या भागात पुराचे पाणी सरळ आले नसल्याचे दिसून येते. परंतु जेथे भिंत नाही, तिकडून पाण्याचा वेगवान प्रवाह गावामध्ये शिरल्याचे दिसते. नव्याने पूररेषा निश्चित करून पूरसंरक्षक भिंतींची संख्या वाढविल्यास पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरGovernmentसरकार