शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

पूरसंरक्षक भिंतींमुळे मिळाला पलूसला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 19:24 IST

कृष्णा नदीकाठी असणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीमुळे यंदाच्या महापुरात काहीसा दिलासा मिळाला. ज्या भागात या भिंती बांधण्यात आल्या आहेत, त्या भागातून नदीचा मुख्य प्रवाह येतो. या प्रवाहाची तीव्रता या पूरसंरक्षक भिंतींमुळे काहीअंशी कमी झाली.

ठळक मुद्देया भिंती असलेल्या ठिकाणी नदीकाठाची फारशी हानी झाली नाही.

अशुतोष कस्तुरेपलूस : पलूस तालुक्यामध्ये २००५ मध्ये आलेल्या महापुरामध्ये मोठी हानी झाली. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका ओळखून तत्कालीन पुनर्वसन व मदतकार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने, नदीकाठची जमीन वाहून जाऊ नये, यासाठी तालुक्यात गावोगावी पूरसंरक्षक भिंती उभारण्यात आल्या. यंदा पाण्याचा प्रचंड विसर्ग होऊनही या भिंतींच्या परिसरातील मंदिरे, स्मशानभूमी सुरक्षित राहिल्या.

कृष्णा नदीकाठी असणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीमुळे यंदाच्या महापुरात काहीसा दिलासा मिळाला. ज्या भागात या भिंती बांधण्यात आल्या आहेत, त्या भागातून नदीचा मुख्य प्रवाह येतो. या प्रवाहाची तीव्रता या पूरसंरक्षक भिंतींमुळे काहीअंशी कमी झाली. पलूस तालुक्यात आमणापूर, बुर्ली, दह्यारी, भिलवडी, धनगाव, नागठाणे, औदुंबर, खोलेवाडी, राडेवाडी या गावांमध्ये पूरसंरक्षक भिंती उभारल्या आहेत. या भिंतींमुळे कृष्णा नदीचा प्रवाह वेगवान असूनही नदीकाठची मंदिरे, इमारती, स्मशानभूमीस धोका पोहोचला नाही.

कृष्णा नदी पलूस तालुक्यात तुपारीपासून दक्षिणवाहिनी आहे. दह्यारी, घोगाव, दुधोंडीपर्यंत ती छोटी वळणे घेत येते. येथून पुढे पुणदी, नागराळे, बुर्ली, संतगाव, शिरगाव, बहे, नागठाणे येथे ती मोठी वळणे घेते. नंतर धनगाव, अंकलखोप, औदुंबर येथे पश्चिमेकडे वाहते. भिलवडीला वळसा घालत चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रह्मनाळपर्यंत ती पुन्हा पूर्वेकडे वाहते. प्रत्येक वळणावर तिच्या प्रवाहाचा वेग वाढतो. त्यामुळे या वळणावर असलेल्या गावांना पुराच्या कालावधीमध्ये वाढलेल्या प्रवाहाचा तडाखा बसतो. याच बाबी लक्षात घेऊन डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने २००५ च्या महापुरानंतर गावोगावी पूरसंरक्षक भिंती उभारण्यात आल्या. या भिंती असलेल्या ठिकाणी नदीकाठाची फारशी हानी झाली नाही. परंतु जेथे भिंती नाहीत, तेथे नदीकाठच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे.

पलूस तालुक्यात ज्या ठिकाणी पूरसंरक्षक भिंती व बंधारे बांधण्यात आले आहेत, त्या भागात बहुतांश धार्मिक स्थळे किंवा स्मशानघाट आहेत. भिंतींमुळे या भागात पुराचे पाणी सरळ आले नसल्याचे दिसून येते. परंतु जेथे भिंत नाही, तिकडून पाण्याचा वेगवान प्रवाह गावामध्ये शिरल्याचे दिसते. नव्याने पूररेषा निश्चित करून पूरसंरक्षक भिंतींची संख्या वाढविल्यास पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरGovernmentसरकार