शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

डाळिंबाला आता ‘अ‍ॅपल बोर’ शेतीचा पर्याय...

By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST

प्रथमच लागवड : मिरज पूर्व, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

प्रवीण जगताप - लिंगनूर -पाणी कमी तरीही उत्पन्नाची हमी, हे सूत्र ज्या पिकांना लागू होते, ती पिके घेण्यात दुष्काळी टापू अग्रेसर असतो. काही ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे नाईलाजास्तव अशा पिकांची निवड केली जाते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर व मंगळवेढा परिसरात आढळणाऱ्या बोरांची शेती मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील काही गावात केली जात आहे. अशात बांगला देशातून आलेल्या नव्या ‘अ‍ॅपल बोर’चे नवीन प्रयोग जानराववाडी (ता. मिरज) व आटपाडकर वस्ती कोंगनोळी परिसर (ता. कवठेमहांकाळ, चाबुकस्वारवाडी व कोंगनोळी हद्दीच्या सीमेवर) येथील चार शेतकऱ्यांनी केला आहे.जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात डाळिंब पिकाचे पारंपरिक उत्पादक आहेत. तीन-चार वर्षांपासून तेल्या, बिब्ब्या या रोगांनी उत्पादकांना पुरते हैराण करून सोडले आहे. यामुळे बसणारी आर्थिक झळ लक्षात घेता काही शेतकरी पीक बदलण्यासाठी डाळिंब पिकाला पर्याय म्हणून बोर फळशेतीचा निर्णय उत्पादक घेऊ लागले आहेत. ‘उमराण चमेली’ या पारंपरिक जातींऐवजी काहींनी ‘अ‍ॅपल बोर’ ही जात निवडून त्याची प्रथमच लागवड केली आहे. यंदा त्याचा बहार सुरू झाला असून, या जातीस जागेवर २५ रुपये प्रति किलोचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे चांगले मार्केट मिळत राहिल्यास व उत्पादकांची संख्या वाहतुकीसाठी वाढल्यास या उत्पादकांनी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.२५ ते ४० रुपयांपर्यंत सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथे मार्केट मिळत आहे. स्थानिक व्यापारीही यांची जागेवरच खरेदी क रू लागले आहेत. किरकोळ विक्रीतही प्रतिसाद मिळत आहे, तर मुंबई येथे दर्जेदार बोरांना ५० रुपयांपर्यंत दर मिळू शकेल, असा विश्वास उत्पादकांना आहे.या जातीचे एक झाड सुमारे २० वर्षे जगते. झाडाला दोनवेळा पावसाळा व हिवाळा असा बहर घेता येतो. पण काही उत्पादक एकदाच चांगला बहर घेतात. मार्चमध्ये छाटणी घेतली जाते. प्रतिझाड ५० ते ८० किलो फळ लागवड होते. प्रत्येक बोराचे वजन ६० ते १०० ग्रॅमपर्यंत भरते. झाडे कायम हिरवीगार राहतात. सामान्य खते, ठिबक, कीटकनाशक फवारणी व फळ बहरात राखण असे किरकोळ कमी जोखमीचे, कमी खर्चाचे व्यवस्थापन आहे. माळरान मुरमाड डोंगराळ दुष्काळी टापूत हे पीक घेता येते. एकरी एक ते दोन टनापर्यंत उत्पादन घेतल्याची उदाहरणे आहेत. चांगले मार्केट व चांगला दर मिळाल्यास किमान अडीच लाख व जास्तीत-जास्त सहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे याचा प्रयोग भविष्यात वाढू शकतो.सांगोला परिसरातून रोपे आणून डाळिंबाच्या रोगांना वैतागून काही नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात याची लागवड केली आहे. आमचे क्षेत्र मर्यादित असल्याने लांबच्या मार्के टपर्यंत वाहतूक खर्च करून परवडत नसल्याने जागेवरच स्थानिक व्यापाऱ्यांना व स्वत: काही बाजार करून २५ रुपये किलोचा दर मिळत आहे. पण उत्पादकांची संख्या वाढत राहिल्यास व फळाची क्रेझ वाढल्यास क्षेत्र वाढविणे व लांबच्या मार्केटमध्ये माल नेणे शक्य होणार आहे.’ - उद्धव आटपाडकर, उत्पादक, आटपाडकर वस्ती, कोंगनोळी.