शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

वाकुर्डे खिंडीतील दरड हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

कोकरुड : गेले चार दिवस कोल्हापूर, रत्नागिरीला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलावर पाणी येऊन नव्याने करण्यात आलेला राज्यमार्ग खचला. पाणी उतरताच ...

कोकरुड : गेले चार दिवस कोल्हापूर, रत्नागिरीला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलावर पाणी येऊन नव्याने करण्यात आलेला राज्यमार्ग खचला. पाणी उतरताच ठेकेदाराने या रस्त्यावर भराव टाकण्यास सुरुवात केली आहे. वाकुर्डे खिंडीतील दरड बाजूला करण्यात आली आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने वारणा नदीला पूर आला आहे. कोल्हापूर, रत्नागिरीला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. विजापूर-गुहागरला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी नव्याने करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी पुराच्या पाण्याने हा राज्यमार्ग खचला. त्यामुळे येथील वाहतूक पूर्ण बंद करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी नदीची पाणीपातळी कमी झाल्याने ठेकेदाराने खचलेल्या ठिकाणी भराव टाकण्यास सुरुवात केली. चार दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला हाेईल, असे सांगण्यात आले. येळापूर-शिराळा मार्गावर वाकुर्डे बुद्रुक खिंडीत दरड कोसळल्याने हा रस्ता बुधवारपासून बंद होता. रविवारी दुपारी तो खुला करण्यात आल्याने वाहतूक सुरू झाली आहे.