शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाडळीत यंदाही फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

By admin | Updated: October 21, 2014 23:37 IST

सलग दोन वर्षे फटाक्यांविना दिवाळी साजरी केली असल्याने, यावर्षी हे गाव हॅट्ट्रिक साधणार आहे.

बाबासाहेब परीट - बिळाशी -कर्णकर्कश्श आवाजाने अनेकांना कायमचे बहिरेपण आले आहे, तर कवठेएकंदसारख्या गावात अनेकांनी प्राण गमावले आहेत. या सर्व बाबींचे गांभीर्य ओळखून पाडळी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी, यशवंत हायस्कूलच्या मुलांनी व ग्रामस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प केला आहे. गेली सलग दोन वर्षे फटाक्यांविना दिवाळी साजरी केली असल्याने, यावर्षी हे गाव हॅट्ट्रिक साधणार आहे. याकामी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जि. प. शाळांनी पुढाकार घेतला आहे.गेली दोन वर्षे पाडळी या गावाने संपूर्ण जिल्ह्यात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने नावलौकिक मिळविला आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, होणारे आर्थिक नुकसान, अपघातामुळे झालेली जीवितहानी याबाबत बाबासाहेब परीट व विजयकुमार जोखे यांनी मुलांना माहिती दिली. मुलांनीही उत्स्फूर्तपणे फटाके न उडविण्याबद्दल निर्धार केला. यावेळी सत्यजित नारायण पाटील हा तिसरीतला विद्यार्थी म्हणाला, ‘‘आम्ही फटाके उडविणार नाही, त्या पैशाची पुस्तके खरेदी करू.आमच्या आजोबांनी फटाके आणलेत, पण मी त्यांना ते शेतात वानरांसाठी उडवा, असे सांगितले’’. सानिका नलवडे ही सहावीतील विद्यार्थिनी म्हणाली, ‘‘सर, आम्ही सर्व मुले फटाके उडविणार नाही. पण गावातील मोठ्या माणसांनी पण हे पाळले पाहिजे. कारण काहीही असो, पण फटाके उडवले नाय पाहिजे.’’या मोहिमेत गावातील सरपंच, उपसरपंच, संदेश पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. सुनील पाटील, अरुण पाटील, हिम्मत पाटील, प्रा. विजयकुमार जोखे, माजी उपसरपंच बाबासाहेब पाटील, सुभाष पाटील, आणि शिक्षकांंनी परिश्रम घेतले आहेत. विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, वक्तृत्व व किल्ला स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावर्षी ‘फटाके नको पुस्तके वाचू’ अभियानभिलवडीत उपक्रम : संस्कार केंद्राचा सहभागभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील साने गुरूजी केंद्राच्यावतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘फटाके नको पुस्तके वाचू’ अभियान राबविण्यात येत आहे.विद्यार्थ्यांनी फटाके उडवू नयेत, त्याऐवजी पुस्तके विकत घ्यावीत व त्यांचे वाचन करावे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम समजून घ्यावेत, या हेतूने गेल्या पाच-सहा वर्षांपासून संस्कार केंद्राचे प्रमुख सुभाष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष जागृती अभियान राबविले जात आहे. यंदाच्या वर्षी भिलवडीबरोबरच अंकलखोप, धनगाव या गावात हे अभियान राबविले जात आहे. यावर्षी संस्कार केंद्राच्या माध्यमातून सुमारे नऊशे ‘साधना बालकुमार दिवाळी अंकां’ची खरेदी केली आहे. २५ रुपये किमतीचा हा अंक १0 रुपये इतक्या नाममात्र सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय ‘श्यामची आई, गंमत गाणी, बोधकथा, संस्कारकथा, बालगीते, साने गुरुजींचे वाङ्मय’ ही सर्व पुस्तके सवलतीच्या दरात वितरित केली आहेत. कमीत कमी फटाके उडवावेत. त्याऐवजी सुट्टीत जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. (वार्ताहर)