शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पाडळीत यंदाही फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

By admin | Updated: October 21, 2014 23:37 IST

सलग दोन वर्षे फटाक्यांविना दिवाळी साजरी केली असल्याने, यावर्षी हे गाव हॅट्ट्रिक साधणार आहे.

बाबासाहेब परीट - बिळाशी -कर्णकर्कश्श आवाजाने अनेकांना कायमचे बहिरेपण आले आहे, तर कवठेएकंदसारख्या गावात अनेकांनी प्राण गमावले आहेत. या सर्व बाबींचे गांभीर्य ओळखून पाडळी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी, यशवंत हायस्कूलच्या मुलांनी व ग्रामस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प केला आहे. गेली सलग दोन वर्षे फटाक्यांविना दिवाळी साजरी केली असल्याने, यावर्षी हे गाव हॅट्ट्रिक साधणार आहे. याकामी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जि. प. शाळांनी पुढाकार घेतला आहे.गेली दोन वर्षे पाडळी या गावाने संपूर्ण जिल्ह्यात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने नावलौकिक मिळविला आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, होणारे आर्थिक नुकसान, अपघातामुळे झालेली जीवितहानी याबाबत बाबासाहेब परीट व विजयकुमार जोखे यांनी मुलांना माहिती दिली. मुलांनीही उत्स्फूर्तपणे फटाके न उडविण्याबद्दल निर्धार केला. यावेळी सत्यजित नारायण पाटील हा तिसरीतला विद्यार्थी म्हणाला, ‘‘आम्ही फटाके उडविणार नाही, त्या पैशाची पुस्तके खरेदी करू.आमच्या आजोबांनी फटाके आणलेत, पण मी त्यांना ते शेतात वानरांसाठी उडवा, असे सांगितले’’. सानिका नलवडे ही सहावीतील विद्यार्थिनी म्हणाली, ‘‘सर, आम्ही सर्व मुले फटाके उडविणार नाही. पण गावातील मोठ्या माणसांनी पण हे पाळले पाहिजे. कारण काहीही असो, पण फटाके उडवले नाय पाहिजे.’’या मोहिमेत गावातील सरपंच, उपसरपंच, संदेश पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. सुनील पाटील, अरुण पाटील, हिम्मत पाटील, प्रा. विजयकुमार जोखे, माजी उपसरपंच बाबासाहेब पाटील, सुभाष पाटील, आणि शिक्षकांंनी परिश्रम घेतले आहेत. विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, वक्तृत्व व किल्ला स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावर्षी ‘फटाके नको पुस्तके वाचू’ अभियानभिलवडीत उपक्रम : संस्कार केंद्राचा सहभागभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील साने गुरूजी केंद्राच्यावतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘फटाके नको पुस्तके वाचू’ अभियान राबविण्यात येत आहे.विद्यार्थ्यांनी फटाके उडवू नयेत, त्याऐवजी पुस्तके विकत घ्यावीत व त्यांचे वाचन करावे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम समजून घ्यावेत, या हेतूने गेल्या पाच-सहा वर्षांपासून संस्कार केंद्राचे प्रमुख सुभाष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष जागृती अभियान राबविले जात आहे. यंदाच्या वर्षी भिलवडीबरोबरच अंकलखोप, धनगाव या गावात हे अभियान राबविले जात आहे. यावर्षी संस्कार केंद्राच्या माध्यमातून सुमारे नऊशे ‘साधना बालकुमार दिवाळी अंकां’ची खरेदी केली आहे. २५ रुपये किमतीचा हा अंक १0 रुपये इतक्या नाममात्र सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय ‘श्यामची आई, गंमत गाणी, बोधकथा, संस्कारकथा, बालगीते, साने गुरुजींचे वाङ्मय’ ही सर्व पुस्तके सवलतीच्या दरात वितरित केली आहेत. कमीत कमी फटाके उडवावेत. त्याऐवजी सुट्टीत जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. (वार्ताहर)