शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पाडळीत यंदाही फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

By admin | Updated: October 21, 2014 23:37 IST

सलग दोन वर्षे फटाक्यांविना दिवाळी साजरी केली असल्याने, यावर्षी हे गाव हॅट्ट्रिक साधणार आहे.

बाबासाहेब परीट - बिळाशी -कर्णकर्कश्श आवाजाने अनेकांना कायमचे बहिरेपण आले आहे, तर कवठेएकंदसारख्या गावात अनेकांनी प्राण गमावले आहेत. या सर्व बाबींचे गांभीर्य ओळखून पाडळी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी, यशवंत हायस्कूलच्या मुलांनी व ग्रामस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प केला आहे. गेली सलग दोन वर्षे फटाक्यांविना दिवाळी साजरी केली असल्याने, यावर्षी हे गाव हॅट्ट्रिक साधणार आहे. याकामी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जि. प. शाळांनी पुढाकार घेतला आहे.गेली दोन वर्षे पाडळी या गावाने संपूर्ण जिल्ह्यात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने नावलौकिक मिळविला आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, होणारे आर्थिक नुकसान, अपघातामुळे झालेली जीवितहानी याबाबत बाबासाहेब परीट व विजयकुमार जोखे यांनी मुलांना माहिती दिली. मुलांनीही उत्स्फूर्तपणे फटाके न उडविण्याबद्दल निर्धार केला. यावेळी सत्यजित नारायण पाटील हा तिसरीतला विद्यार्थी म्हणाला, ‘‘आम्ही फटाके उडविणार नाही, त्या पैशाची पुस्तके खरेदी करू.आमच्या आजोबांनी फटाके आणलेत, पण मी त्यांना ते शेतात वानरांसाठी उडवा, असे सांगितले’’. सानिका नलवडे ही सहावीतील विद्यार्थिनी म्हणाली, ‘‘सर, आम्ही सर्व मुले फटाके उडविणार नाही. पण गावातील मोठ्या माणसांनी पण हे पाळले पाहिजे. कारण काहीही असो, पण फटाके उडवले नाय पाहिजे.’’या मोहिमेत गावातील सरपंच, उपसरपंच, संदेश पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. सुनील पाटील, अरुण पाटील, हिम्मत पाटील, प्रा. विजयकुमार जोखे, माजी उपसरपंच बाबासाहेब पाटील, सुभाष पाटील, आणि शिक्षकांंनी परिश्रम घेतले आहेत. विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, वक्तृत्व व किल्ला स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावर्षी ‘फटाके नको पुस्तके वाचू’ अभियानभिलवडीत उपक्रम : संस्कार केंद्राचा सहभागभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील साने गुरूजी केंद्राच्यावतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘फटाके नको पुस्तके वाचू’ अभियान राबविण्यात येत आहे.विद्यार्थ्यांनी फटाके उडवू नयेत, त्याऐवजी पुस्तके विकत घ्यावीत व त्यांचे वाचन करावे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम समजून घ्यावेत, या हेतूने गेल्या पाच-सहा वर्षांपासून संस्कार केंद्राचे प्रमुख सुभाष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष जागृती अभियान राबविले जात आहे. यंदाच्या वर्षी भिलवडीबरोबरच अंकलखोप, धनगाव या गावात हे अभियान राबविले जात आहे. यावर्षी संस्कार केंद्राच्या माध्यमातून सुमारे नऊशे ‘साधना बालकुमार दिवाळी अंकां’ची खरेदी केली आहे. २५ रुपये किमतीचा हा अंक १0 रुपये इतक्या नाममात्र सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय ‘श्यामची आई, गंमत गाणी, बोधकथा, संस्कारकथा, बालगीते, साने गुरुजींचे वाङ्मय’ ही सर्व पुस्तके सवलतीच्या दरात वितरित केली आहेत. कमीत कमी फटाके उडवावेत. त्याऐवजी सुट्टीत जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. (वार्ताहर)