शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर शब्द झाले परवलीचे;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST

शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : या वर्षाची सुरुवात होतानाच कोरोनाची कुणकुण लागली आणि संपूर्ण वर्ष त्याच्या ...

शरद जाधव /

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : या वर्षाची सुरुवात होतानाच कोरोनाची कुणकुण लागली आणि संपूर्ण वर्ष त्याच्या निवारणातच गेले. गेल्या दहा महिन्यात अनेक बदल घडताना, अगदी वाडी-वस्तीवरील आजी-आजोबांच्या तोंडीही क्वारंटाईन, पॉझिटिव्ह असे शब्द आले. तसेच केवळ वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेली ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर आदी उपकरणे प्रत्येक घरातील भाग बनली. आरोग्यविषयक जागृती वाढतानाच हाताची स्वच्छता, मास्कचा वापर यामुळे वैयक्तिक स्वच्छतेकडे कल वाढला असला तरी, हे वर्ष प्रत्येकालाच नवीन अनुभव देऊन गेले.

कोरोनाचा कहर अनुभवलेल्या जिल्ह्यात सध्या दिलासादायक चित्र आहे. तरीही काेरोनामुळे सर्वांनाच स्वत:चे आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याचा अनुभव आला. मार्च महिन्यात पहिला रूग्ण आढळल्यानंतर जुलैपर्यंत बाधितांची संख्या मर्यादित होती. मात्र, त्यानंतर वेगाने संख्या वाढून, एक वेळ अशी आली की, जिल्हा कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ ठरला होता. मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक हाेते. या परिस्थितीवर मात करत आता कोरोनाच्या कटू आठवणींना विसरत प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे.

गेल्यावर्षीपर्यंत ऑक्सिजनची पातळी किती असावी, शरीरातील तापमान किती असावे आणि एचआरसीटी स्कोर किती, याबाबत प्रत्येकजण अनभिज्ञ होता. आता मात्र, लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत ऑक्सिमीटरचा वापर करत आहेत. तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनर वापरला जात आहे, तर फक्त डॉक्टरांच्या इंजेक्शनपूर्वीच वापरले जाणारे सॅनिटायझर प्रत्येकाच्या घराच्या प्रवेशव्दारावर हात स्वच्छ करण्यासाठी सज्ज असते.

बाहेरून घरात आल्यानंतर हात-पाय धुणे अगोदर अनेकजण टाळत होते. कोरोनामुळे मात्र, वैयक्तिक स्वच्छतेचे प्रमाण खूप वाढले. बाहेरून आल्यानंतर हाताची स्वच्छता तर सुरू केलीच, शिवाय साबणाचा वापर आणि नियमित मास्कचा वापर सुरू केल्याने, कोरोनाशिवाय इतर होणाऱ्या आजारांपासून मात्र चांगलेच संरक्षण झाले.

चौकट

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर असताना, कोरोनावर मात करणाऱ्यांचेही प्रमाण चांगले आहे. तरीही गेल्या दहा महिन्यांतील जिल्ह्याचा अनुभव आरोग्यविषयक जनजागृती करणारा ठरला आहे.