शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अतिघाईमुळे गेले ८ हजारांवर बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अतिघाई मृत्यूला निमंत्रण देई...असे फलक पाहूनही त्याकडे कानाडोळा करीत सुसाट सुटलेल्या राज्यातील ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अतिघाई मृत्यूला निमंत्रण देई...असे फलक पाहूनही त्याकडे कानाडोळा करीत सुसाट सुटलेल्या राज्यातील तब्बल ८ हजार लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अशा अतिघाईने बळी गेलेल्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. यामध्येही हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांची संख्याही अधिक आहे.

राज्यातील अपघातात बळी गेलेल्यांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. बेशिस्तपणा व बेफिकीरी ही दोन ठळक कारणे यामागे आहेत. वाहतुकीचे नियम तोडल्याने २०१९ मध्ये १२ हजार ७८८ लोकांचे बळी गेले. त्यात जवळपास ४१ टक्के बळी हेे अतिवेगात वाहन चालविल्यामुळे गेले आहेत. दारू पिऊन वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल मोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे यासह अन्य नियम मोडल्याने दरवर्षी हजारो जीव जात आहेत. अशा नियमांच्या उल्लंघनाच्या व त्यातून अपघाताच्या घटनाही दरवर्षी वाढत आहेत.

चौकट

नियम मोडल्याचे परिणाम (२०१९)

उल्लंघनाचा प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ८१७५ ११,९४७

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह ५३ १२८

चुकीच्या दिशेने वाहन चालविणे १५४ ३८८

मोबाईल वापर १३ ६७

सिग्नल तोडणे ४ ३५

अन्य कारणे ४३८९ ६५८७

चौकट

नियमभंगामुळे अपघाताचे तुलनात्मक आकडे

२०१८

प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ३९२९ ५६२३

अन्य नियमांचे उल्लंघन ४९७ ८५०

२०१९

प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ८१७५ ११९४७

अन्य नियमांचे उल्लंघन ४६१३ ७२०५

चौकट

दुचाकीस्वारांना धोका अधिक

राज्यातील वाहन प्रकारानुसार अपघातांच्या एकूण आकडेवारीचा विचार केल्यास, सर्वाधिक म्हणजेच ४० टक्के अपघातग्रस्त दुचाकीस्वार आहेत. दुचाकीचे एकूण १३ हजार ३३० अपघात झाले असून, त्यात ५८९४ दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे.

चौकट

निष्पाप पादचारी बळी

दुचाकी व अन्य वाहनांच्या चुकीमुळे निष्पाप २८४९ पादचाऱ्यांचे बळी गेल्याची, तर ३ हजार ७७४ पादचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याची नोंद २०१९ मध्ये झाली.