शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अतिघाईमुळे गेले ८ हजारांवर बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अतिघाई मृत्यूला निमंत्रण देई...असे फलक पाहूनही त्याकडे कानाडोळा करीत सुसाट सुटलेल्या राज्यातील ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अतिघाई मृत्यूला निमंत्रण देई...असे फलक पाहूनही त्याकडे कानाडोळा करीत सुसाट सुटलेल्या राज्यातील तब्बल ८ हजार लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अशा अतिघाईने बळी गेलेल्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. यामध्येही हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांची संख्याही अधिक आहे.

राज्यातील अपघातात बळी गेलेल्यांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. बेशिस्तपणा व बेफिकीरी ही दोन ठळक कारणे यामागे आहेत. वाहतुकीचे नियम तोडल्याने २०१९ मध्ये १२ हजार ७८८ लोकांचे बळी गेले. त्यात जवळपास ४१ टक्के बळी हेे अतिवेगात वाहन चालविल्यामुळे गेले आहेत. दारू पिऊन वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल मोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे यासह अन्य नियम मोडल्याने दरवर्षी हजारो जीव जात आहेत. अशा नियमांच्या उल्लंघनाच्या व त्यातून अपघाताच्या घटनाही दरवर्षी वाढत आहेत.

चौकट

नियम मोडल्याचे परिणाम (२०१९)

उल्लंघनाचा प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ८१७५ ११,९४७

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह ५३ १२८

चुकीच्या दिशेने वाहन चालविणे १५४ ३८८

मोबाईल वापर १३ ६७

सिग्नल तोडणे ४ ३५

अन्य कारणे ४३८९ ६५८७

चौकट

नियमभंगामुळे अपघाताचे तुलनात्मक आकडे

२०१८

प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ३९२९ ५६२३

अन्य नियमांचे उल्लंघन ४९७ ८५०

२०१९

प्रकार मृत्यू गंभीर इजा

अतिवेग ८१७५ ११९४७

अन्य नियमांचे उल्लंघन ४६१३ ७२०५

चौकट

दुचाकीस्वारांना धोका अधिक

राज्यातील वाहन प्रकारानुसार अपघातांच्या एकूण आकडेवारीचा विचार केल्यास, सर्वाधिक म्हणजेच ४० टक्के अपघातग्रस्त दुचाकीस्वार आहेत. दुचाकीचे एकूण १३ हजार ३३० अपघात झाले असून, त्यात ५८९४ दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे.

चौकट

निष्पाप पादचारी बळी

दुचाकी व अन्य वाहनांच्या चुकीमुळे निष्पाप २८४९ पादचाऱ्यांचे बळी गेल्याची, तर ३ हजार ७७४ पादचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याची नोंद २०१९ मध्ये झाली.