शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

६९९ गावांपैकी तीन गावांमध्येच मीटरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:17 IST

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस , कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी २५ हजार ७७ कुटुंबांकडेच पाणी कनेक्शन्स असून उर्वरित कुटुंबे घेत असलेल्या पाण्याचा हिशेबच होत नाही.जिल्ह्यात ३७ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची तहान भागविली जात आहे. यापैकी १७ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद चालवित असून सध्या ११ योजना केवळ वीज बिल थकीत असल्यामुळे बंद आहेत. त्याला पूरक सावळज (ता. तासगाव) योजना २०१४, तर आरग-बेडग, बेळंकी (ता. मिरज) योजना २००७ पासून बंद आहे. येळावी (ता. तासगाव), रायगाव (ता. कडेगाव), वाघोली (ता. कवठेमहांकाळ), नांद्रे-वसगडे (ता. पलूस), मणेराजुरी-कवठेमहांकाळ-विसापूर या पाच योजनांचा वीजपुरवठा मार्चपासून खंडित असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती चालू आहे. पेड (ता. तासगाव) ही योजना आॅगस्ट २०१६ पासून तलावात पाणी नसल्याने बंद आहे. यापैकी बहुतांशी प्रादेशिक योजना ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यामुळे त्यांच्या पाईपलाईनला गळती आहे. जलशुध्दीकरणासह पंपिंग यंत्रसामग्री कालबाह्य झाल्यामुळे तीही बदलण्याची गरज आहे. या योजना दुरुस्तीसाठी जवळपास शंभर ते सव्वाशे कोटींच्या निधीची गरज आहे.याशिवाय, १९ पाणी पुरवठा योजना शिखर समिती आणि ग्रामपंचायती चालवत आहेत. यापैकीही किल्लेमच्छिंद्रगड, बहे (ता. वाळवा), माधवनगर (ता. मिरज), सावळज (ता. तासगाव), पणुंब्रेतर्फ वारुण, रिळे, कांदे, येळापूर (ता. शिराळा), नेर्ली, नेवरी (ता. कडेगाव) येथील पाणी पुरवठा योजना तीन ते चार वर्षापासून बंद आहेत. कोणतीही तांत्रिक वस्तुस्थिती जाणून न घेता राजकीय दबावामुळे स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिल्यामुळे कोट्यवधीच्या योजना सध्या बंद पडल्या आहेत. याला राजकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांची चुकीची धोरणेच जबाबदार आहेत. पूर्वी चार ते दहा गावांसाठी एक योजना केली होती. यामधून अनेक गावे बाहेर पडल्यामुळे मोठ्या योजनांचा बोजा छोट्या गावांवर पडल्यामुळे त्यांच्या खिशाला योजनेचे पाणी परवडत नसल्याचे दिसत आहे.योजना केल्यानंतर कुटुंबांना पाणी कनेक्शन घेण्याची सवयच लावली नसल्यामुळे पाण्याचा बेकायदेशीर वापर वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात १२ प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ८८ गावांमध्ये ५८ हजार २८५ कुटुंब संख्या असताना, केवळ २५ हजार ७७ नळ जोडण्या आहेत. ३३ हजार २०८ कुटुंबियांकडे पाणी कनेक्शनच नाहीत. सार्वजनिक नळातूनच पाण्याचा वापर होत आहे. याहीपेक्षा धक्कादायक प्रकार म्हणजे, जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ वाळवा तालुक्यातील बिचूद, येडेनिपाणी व मिरज तालुक्यातील हरिपूर या गावामध्येच नागरिकांना मीटरने मोजून पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा लेखाजोखा...योजनेचे नाव गावे कुटुंबे नळ जोडण्या थकीत पाणीपट्टी सद्यस्थितीकासेगाव मूळ ७ ६४१७ ३००० ३५१४७९२८ नूतनीकरण सुरुकासेगाव नवीन ७ ३८६९ १९९९ नूतनीकरण सुरुनवेखेड-जुनेखेड २ १०४१ ७८९ ३७७१२९४ योजना सुरळीत सुरुतुंग-बागणी ४ १४१२ ११४५ ४८१३७४७ दुरुस्तीची गरजवाघोली ३ ३८३ १०३ ५८८१९९ योजना बंदनांद्रे-वसगडे ५ १५४० ११५१ १५१८०४५६ दुरुस्तीची गरजमणेराजुरी/कवठेमहांकाळ/ ३१ २१०८७ ६३३८ २१५४३१२१ योजना बंदविसापूरपेड ५ ३६८३ १३६१ ४६०२३७९ योजना बंदयेळावी ९ ४७२० १२३७ २६८८९९५ योजना बंदकुंडल १४ ३९४७ ७८८७ २८२२०९६२ दुरुस्तीची गरजएकूण ८८ ५८२८५ २५०७७ ११७०५१४९०