शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

६९९ गावांपैकी तीन गावांमध्येच मीटरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:17 IST

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस , कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. उर्वरित शिराळा, पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या शहरांसह ६९६ गावांमध्ये आजही मीटरने पाणी दिले जात नाही. तसेच बारा प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ५८ हजार २८५ कुटुंबांपैकी २५ हजार ७७ कुटुंबांकडेच पाणी कनेक्शन्स असून उर्वरित कुटुंबे घेत असलेल्या पाण्याचा हिशेबच होत नाही.जिल्ह्यात ३७ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची तहान भागविली जात आहे. यापैकी १७ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद चालवित असून सध्या ११ योजना केवळ वीज बिल थकीत असल्यामुळे बंद आहेत. त्याला पूरक सावळज (ता. तासगाव) योजना २०१४, तर आरग-बेडग, बेळंकी (ता. मिरज) योजना २००७ पासून बंद आहे. येळावी (ता. तासगाव), रायगाव (ता. कडेगाव), वाघोली (ता. कवठेमहांकाळ), नांद्रे-वसगडे (ता. पलूस), मणेराजुरी-कवठेमहांकाळ-विसापूर या पाच योजनांचा वीजपुरवठा मार्चपासून खंडित असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती चालू आहे. पेड (ता. तासगाव) ही योजना आॅगस्ट २०१६ पासून तलावात पाणी नसल्याने बंद आहे. यापैकी बहुतांशी प्रादेशिक योजना ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यामुळे त्यांच्या पाईपलाईनला गळती आहे. जलशुध्दीकरणासह पंपिंग यंत्रसामग्री कालबाह्य झाल्यामुळे तीही बदलण्याची गरज आहे. या योजना दुरुस्तीसाठी जवळपास शंभर ते सव्वाशे कोटींच्या निधीची गरज आहे.याशिवाय, १९ पाणी पुरवठा योजना शिखर समिती आणि ग्रामपंचायती चालवत आहेत. यापैकीही किल्लेमच्छिंद्रगड, बहे (ता. वाळवा), माधवनगर (ता. मिरज), सावळज (ता. तासगाव), पणुंब्रेतर्फ वारुण, रिळे, कांदे, येळापूर (ता. शिराळा), नेर्ली, नेवरी (ता. कडेगाव) येथील पाणी पुरवठा योजना तीन ते चार वर्षापासून बंद आहेत. कोणतीही तांत्रिक वस्तुस्थिती जाणून न घेता राजकीय दबावामुळे स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिल्यामुळे कोट्यवधीच्या योजना सध्या बंद पडल्या आहेत. याला राजकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांची चुकीची धोरणेच जबाबदार आहेत. पूर्वी चार ते दहा गावांसाठी एक योजना केली होती. यामधून अनेक गावे बाहेर पडल्यामुळे मोठ्या योजनांचा बोजा छोट्या गावांवर पडल्यामुळे त्यांच्या खिशाला योजनेचे पाणी परवडत नसल्याचे दिसत आहे.योजना केल्यानंतर कुटुंबांना पाणी कनेक्शन घेण्याची सवयच लावली नसल्यामुळे पाण्याचा बेकायदेशीर वापर वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात १२ प्रादेशिक योजनांच्या कार्यक्षेत्रात ८८ गावांमध्ये ५८ हजार २८५ कुटुंब संख्या असताना, केवळ २५ हजार ७७ नळ जोडण्या आहेत. ३३ हजार २०८ कुटुंबियांकडे पाणी कनेक्शनच नाहीत. सार्वजनिक नळातूनच पाण्याचा वापर होत आहे. याहीपेक्षा धक्कादायक प्रकार म्हणजे, जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ वाळवा तालुक्यातील बिचूद, येडेनिपाणी व मिरज तालुक्यातील हरिपूर या गावामध्येच नागरिकांना मीटरने मोजून पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा लेखाजोखा...योजनेचे नाव गावे कुटुंबे नळ जोडण्या थकीत पाणीपट्टी सद्यस्थितीकासेगाव मूळ ७ ६४१७ ३००० ३५१४७९२८ नूतनीकरण सुरुकासेगाव नवीन ७ ३८६९ १९९९ नूतनीकरण सुरुनवेखेड-जुनेखेड २ १०४१ ७८९ ३७७१२९४ योजना सुरळीत सुरुतुंग-बागणी ४ १४१२ ११४५ ४८१३७४७ दुरुस्तीची गरजवाघोली ३ ३८३ १०३ ५८८१९९ योजना बंदनांद्रे-वसगडे ५ १५४० ११५१ १५१८०४५६ दुरुस्तीची गरजमणेराजुरी/कवठेमहांकाळ/ ३१ २१०८७ ६३३८ २१५४३१२१ योजना बंदविसापूरपेड ५ ३६८३ १३६१ ४६०२३७९ योजना बंदयेळावी ९ ४७२० १२३७ २६८८९९५ योजना बंदकुंडल १४ ३९४७ ७८८७ २८२२०९६२ दुरुस्तीची गरजएकूण ८८ ५८२८५ २५०७७ ११७०५१४९०