शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दहा आगारातील १५११ पैकी ६२ चालकांकडूनच अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली विभागामध्ये सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस, इस्लामपूर, शिराळा, आदी दहा आगारातून जिल्ह्यातील प्रवाशांना सेवा दिली ...

सांगली विभागामध्ये सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस, इस्लामपूर, शिराळा, आदी दहा आगारातून जिल्ह्यातील प्रवाशांना सेवा दिली जात आहे. या आगारामध्ये एकूण एक हजार ५११ चालक कार्यरत आहेत. त्यापैकी जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ६२ चालकांकडूनच अपघात झाले आहेत. चोवीस अपघात हे अत्यंत किरकोळ असून २६ अपघात गंभीर आहेत. बारा अपघातांमध्ये समोरच्या व्यक्तीला प्राण गमवावे लागले आहेत. बारा महिन्यांपैकी एप्रिल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांत एसटीचा एकही अपघात झाला नाही. अपघात टाळण्यासाठी चालकांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी अधिकारी वर्गही सातत्याने प्रबोधन करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चौकट

मागील वर्षात झालेले एसटीचे अपघात

महिना अपघात संख्या

जानेवारी ११

फेब्रुवारी २३

मार्च ६

मे ३

जून १

ऑक्टोबर ५

नोव्हेंबर ७

डिसेंबर ६

एकूण ६२

चौकट

जिल्ह्यातील एसटी चालकांची एकूण संख्या : १५११

दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा : ३८

पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा : २२

चौकट

विनाअपघात सत्कार पात्र

-३० वर्षे विनाअपघात सेवा : ४

-२५ वर्षे विनाअपघात सेवा : ३१

-२० वर्षे विनाअपघात सेवा : २३

- १५ वर्षे विनाअपघात सेवा : २२

-१० वर्षे विनाअपघात सेवा : ३८-

-५ वर्षे विनाअपघात सेवा : २

एकूण : १२०

कोट

एसटी चालकांच्या चुकीमुळे अत्यंत कमी अपघात झाले आहेत. चालक नेहमी विनाअपघात प्रवाशांना सेवा देऊन महामंडळाकडून होणाऱ्या सत्कारासाठी पात्र होण्यासाठी धडपडत असतो. शंभर टक्के एसटीचा प्रवास सुरक्षित आणि खात्रीशीरच असतो, पण काहीवेळा समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे किरकोळ अपघाताला एसटीच्या चालकास सामोरे जावे लागते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

-आलम देसाई, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, सांगली.

चौकट

स्पीड लॉक, तरीही कालबाह्य बसेसमुळे अपघात

लांब पल्ल्याच्या बसेस ताशी ७० किलो मीटरला आणि ग्रामीण बसेस ताशी ६० किलो मीटरला स्पीड लॉक आहेत. तरीही २०२० या वर्षात ६२ अपघात झाले आहेत. याबाबत एसटी प्रशासनाशी चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले की, काहीवेळा अचानक दुसरे वाहन बसला धडकते. अनेक कालबाह्य बसेस, बसचा ब्रेक फेल आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे स्पीड लॉक असतानाही अपघात होत आहेत.

कोट

फोटो : ३०रमेश जाधव

कौटुंबिक अडचणी आणि कार्यालयातील समस्या तिथेच ठेवून शांतपणे प्रवाशांची सेवा केली. मी स्वत: वारकरी असल्यामुळे प्रवासी आणि अन्य वाहन चालकांशीही माझे कधी भांडण झाले नाही. कोणतेही व्यसन नसल्यामुळेच तीस वर्षे विनाअपघात प्रवाशांची सेवा करता आली.

-रमेश जाधव, चालक, तासगाव आगार.