शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘ओटीएस’ने मिळणार १०० कोटींची सवलत

By admin | Updated: November 5, 2015 23:54 IST

भूविकास बॅँक : कायमची बंद होणार योजना

सांगली : भूविकास बॅँकेच्या जिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांना कर्जमुक्त होण्यासाठी लागू केलेल्या एकरकमी कर्जपरतफेड योजनेला आता केवळ पाच महिन्यांचा कालावधी उरला आहे. तब्बल १३६ कोटी २५ लाखांचा थकबाकीचा डोंगर असला तरी, योजनेचा लाभ घेतल्यास १०० कोटी ९६ लाखांची सवलत मिळू शकते. जिल्हा भूविकास बॅँकेकडे २६५२ थकबाकीदार सभासद असून, त्यांच्याकडून प्रचलित पद्धतीनुसार १३६ कोटी २५ लाख रुपये येणे आहेत. एकरकमी योजनेतून त्यांना केवळ ३५ कोटी २९ लाख रुपये भरावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाने २००७ पासून वारंवार एकरकमी परतफेड योजना लागू केली. मुदतवाढही दिली. त्यास सभासदांचाही प्रतिसाद मिळाला. यावेळी दिलेली एकरकमीची शेवटची संधी आहे. मार्च २०१६ नंतर ही योजना कायमची बंद होणार आहे. त्यामुळे थकबाकीदार सभासदांवर कारवाई करण्यात येणार आहे. सध्याच्या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला असून, २४ जुलै २०१५ पासून सुरू झालेल्या योजनेअंतर्गत ४९ सभासदांनी ३७ लाख ५० हजार रुपये भरून त्यांनी त्यांच्या जमिनी बोजामुक्त केल्या आहेत. अन्य थकबाकीदारांनाही त्यांच्या जमिनीवरील बॅँकेचा बोजा उतरविण्याची संधी यानिमित्ताने आली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅँकेच्यावतीने करण्यात आले आहे.सांगली जिल्हा भूविकास बॅँकेचा सक्षम बॅँकेत समावेश असूनही अवसायनाच्या प्रक्रियेत आता ती भरडली जात आहे. राज्यातील सर्वच बॅँकांप्रमाणे या बॅँकेचेही आता ‘पॅक-अप’ होणार आहे. १९३५ मध्ये भू तारण बँक नावाने स्थापन केलेल्या या बँकेचे १९६० मध्ये भू-विकास बँक असे नामकरण करण्यात आले होते. नाबार्डकडून निधी घेऊन शेतकऱ्यांना कर्ज देणे व ते वसूल करून पुन्हा नाबार्डला देणे, हे मुख्य कार्य या बँकेचे होते. शेती व सिंचन कर्जामुळे ही बँक शेती विकासात महत्त्वाची संस्था ठरली होती. (प्रतिनिधी)अधोगती थांबली नाहीजिल्ह्यातील भूविकास बॅँक १९९५ नंतर अडचणीत येत गेली. युती शासनाच्या काळात या बँकेला शासनाने थकहमी नाकारली. त्यामुळे नाबार्डने बँकेला कर्ज पुरवठा बंद केला. बँकेला कर्ज पुरवठा बंद झाल्याने बँक बंद पडणार, अशी अफवा पसरली. त्यामुळे कर्जवसुलीही थांबली. ८ जून २००७ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आला. त्यानंतर बँक उर्जितावस्थेत आणण्यासाठी काहीही प्रयत्न झाले नाहीत.