शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

‘ओटीएस’ने मिळणार १०० कोटींची सवलत

By admin | Updated: November 5, 2015 23:54 IST

भूविकास बॅँक : कायमची बंद होणार योजना

सांगली : भूविकास बॅँकेच्या जिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांना कर्जमुक्त होण्यासाठी लागू केलेल्या एकरकमी कर्जपरतफेड योजनेला आता केवळ पाच महिन्यांचा कालावधी उरला आहे. तब्बल १३६ कोटी २५ लाखांचा थकबाकीचा डोंगर असला तरी, योजनेचा लाभ घेतल्यास १०० कोटी ९६ लाखांची सवलत मिळू शकते. जिल्हा भूविकास बॅँकेकडे २६५२ थकबाकीदार सभासद असून, त्यांच्याकडून प्रचलित पद्धतीनुसार १३६ कोटी २५ लाख रुपये येणे आहेत. एकरकमी योजनेतून त्यांना केवळ ३५ कोटी २९ लाख रुपये भरावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाने २००७ पासून वारंवार एकरकमी परतफेड योजना लागू केली. मुदतवाढही दिली. त्यास सभासदांचाही प्रतिसाद मिळाला. यावेळी दिलेली एकरकमीची शेवटची संधी आहे. मार्च २०१६ नंतर ही योजना कायमची बंद होणार आहे. त्यामुळे थकबाकीदार सभासदांवर कारवाई करण्यात येणार आहे. सध्याच्या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला असून, २४ जुलै २०१५ पासून सुरू झालेल्या योजनेअंतर्गत ४९ सभासदांनी ३७ लाख ५० हजार रुपये भरून त्यांनी त्यांच्या जमिनी बोजामुक्त केल्या आहेत. अन्य थकबाकीदारांनाही त्यांच्या जमिनीवरील बॅँकेचा बोजा उतरविण्याची संधी यानिमित्ताने आली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅँकेच्यावतीने करण्यात आले आहे.सांगली जिल्हा भूविकास बॅँकेचा सक्षम बॅँकेत समावेश असूनही अवसायनाच्या प्रक्रियेत आता ती भरडली जात आहे. राज्यातील सर्वच बॅँकांप्रमाणे या बॅँकेचेही आता ‘पॅक-अप’ होणार आहे. १९३५ मध्ये भू तारण बँक नावाने स्थापन केलेल्या या बँकेचे १९६० मध्ये भू-विकास बँक असे नामकरण करण्यात आले होते. नाबार्डकडून निधी घेऊन शेतकऱ्यांना कर्ज देणे व ते वसूल करून पुन्हा नाबार्डला देणे, हे मुख्य कार्य या बँकेचे होते. शेती व सिंचन कर्जामुळे ही बँक शेती विकासात महत्त्वाची संस्था ठरली होती. (प्रतिनिधी)अधोगती थांबली नाहीजिल्ह्यातील भूविकास बॅँक १९९५ नंतर अडचणीत येत गेली. युती शासनाच्या काळात या बँकेला शासनाने थकहमी नाकारली. त्यामुळे नाबार्डने बँकेला कर्ज पुरवठा बंद केला. बँकेला कर्ज पुरवठा बंद झाल्याने बँक बंद पडणार, अशी अफवा पसरली. त्यामुळे कर्जवसुलीही थांबली. ८ जून २००७ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आला. त्यानंतर बँक उर्जितावस्थेत आणण्यासाठी काहीही प्रयत्न झाले नाहीत.