शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा विश्वास कारखान्याचे खासगीकरण

By admin | Updated: September 22, 2015 23:50 IST

मानसिंगराव नाईक : वार्षिक सर्वसाधारण सभेत इशारा; शासनाच्या धोरणाबाबत नाराजीचा सूर

शिराळा : सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणणे, कारखान्यांची प्रगती रोखणे, चांगले काम करू न देणे अशा शासनाच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघण्यास वेळ लागणार नाही. आता काळाची गरज ओळखून सभासदांचे हक्क अबाधित ठेवून सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्यादृष्टीने पावले उचलावी लागतील, असा इशारा विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी दिला.भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे कारखान्याच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सर्जेरावदादा बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, बाबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष नाईक म्हणाले की, केंद्र सरकारने याअगोदर साखर दर ३२५० रुपये धरून एफआरपी काढली आणि आता दर २००० रुपयांपर्यंत आहेत. मग केंद्र शासनाने हा मधील फरक अनुदान म्हणून द्यावा. शासनाने कारखान्यांना १५ हजार कोटी दिले आहेत. ते अनुदान नसून कर्ज आहे. त्यामुळे ही कर्जफेड पुढील वर्षापासून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातूनच जाणार आहे. शासनाने कर्जाऐवजी अनुदान द्यावे.ते म्हणाले की, आज विश्वास कारखाना स्वनिधीतून आधुनिकीकरण, डिस्टिलरी प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी परवानगी मागत आहे. मात्र शासन त्याला परवानगी देत नाही. यामध्ये कारखानदारीबरोबर चाळीस हजार शेतकरी अडचणीत येणार आहेत. शासनाचे असेच धोरण राहिले तर, काळाची गरज ओळखून सभासदांचे हक्क अबाधित ठेवून कारखान्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. कोणताही निर्णय शेतकरी सभासदांच्या परवानगीनेच घेतला जाईल. गेल्या १५ वर्षांत १५१ कोटींची गुंतवणूक करून १२५० टन क्षमतेचा कारखाना चार हजार टन ऊस गाळप क्षमतेचा झाला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून २१ कोटींची वीज यावर्षी विकली जाणार आहे. हा प्रकल्प येत्या चार वर्षात कर्जमुक्त होईल.यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील, अमरसिंह नाईक, दिनकरराव पाटील, रणजितसिंह नाईक, विराज नाईक, विलासराव पाटील, युवराज गायकवाड, विश्वास कदम, भीमराव गायकवाड, राजेंद्रसिंह नाईक, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेशराव चव्हाण, संजय नाईक, अरुण साळुंखे, प्रमोद नाईक, दिनकर महिंद, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. संचालक विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांनी अहवाल वाचन केले. अभिमन्यू निकम, अशोक कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)इतर कारखान्यांच्या दराशी तुलनायावेळी माजी संचालक पी. के. पाटील यांनी इतर कारखाने किती जादा देतात, असा प्रश्न उपस्थित केला. यास उत्तर देताना अध्यक्ष नाईक यांनी, शिवाजी केनने पहिल्यांदा दोन हजार, नंतर एक हजार दर दिला. उदय कारखान्याने पहिले दोन महिने २४०० रुपये दिले. नंतर किती दर दिला, रयतने किती पैसे दिले, ते संबंधित ऊस घालणाऱ्यांना विचारा म्हणजे समजेल. आपण सर्व उत्पादकांना एकच दर शेवटपर्यंत दिला आहे. आॅक्टोबरमध्ये ३१६ रुपयांचा हप्ता वर्ग करणार आहे. त्यामुळे २४१६ रुपये दर विश्वास कारखाना देणार आहे.यावेळी डॉ. निवृत्त महिंद यांनी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना खासगी करावा, असा ठराव मांडला. त्यास बळवंत पाटील यांनी अनुमोदन दिले.