शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा धरणग्रस्तांची कोयना धरणावर धडक

By admin | Updated: May 1, 2015 00:16 IST

भारत पाटणकर : चांदोली राष्ट्रीय उद्यानावर मोर्चावेळी इशारा

वारणावती : धरणग्रस्तांसाठी २३ नागरी सुविधांसाठी निधी उपलब्धतेची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यामुळे या वर्षात १०० टक्के कामे पूर्ण होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या १२ मे च्या बैठकीचे निमंत्रण ५ मे पर्यंत आले नाही, तर राज्यातले सर्व धरणग्रस्त एकत्र करुन कोयना धरणावर धडक मारणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत समाधानकारक निर्णय झाले तरच आंदोलन स्थगित होईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.ते गुरुवारी वारणावती येथील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या धरणग्रस्तांच्या मोर्चासमोर बोलत होते. प्रारंभी धरणग्रस्तांनी वारणावती येथील चांदोली राष्ट्रीय उद्यानावर मोर्चा आणला. घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चामध्ये विविध सदस्यांनी भाषणे झाली. दुपारी ३ वाजता डॉ. भारत पाटणकर यांची चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यालयात धरणग्रस्तांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी पाटबंधारे विभागाचे व चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी तसेच धरणग्रस्तांचे प्रतिनिधींसमवेत दोन तास बैठक झाली. बैठकीतील निर्णय डॉ. भारत पाटणकर यांनी धरणग्रस्तांना सांगितले. ते म्हणाले, मुंबईमध्ये सचिव व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ८ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी ६.२४ कोटींचा निधी मिळालेला आहे. उर्वरित निधी तातडीने मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे ठरले आहे. निधीतून धरणग्रस्त व अभयारण्याग्रस्तांच्या वसाहतीतील नागरी सुविधांच्या कामांना सुरुवात झाली आहे. नागरी सुविधांसाठीच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केलेली असल्याने वर्षभरात शंभर टक्के कामे पूर्ण होणार आहेत. कोअर झोनमधील गावांचे सक्तीने पुनर्वसन करावे लागणार आहे. न्यायालयीन आदेशानुसार ही कार्यवाही होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून १२ मे च्या बैठकीचे निमंत्रण ५ मे पर्यंत प्राप्त झाले नाही, तर राज्यातील सर्व धरणग्रस्त एकत्र येऊन कोयना धरणाकडे चाल करून धरणाचा ताबा घेतील, असा इशारा डॉ. पाटणकर यांनी दिला आहे.यावेळी वारणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जे. जे. बारदेस्कर, विभागीय वनअधिकारी एम. एम. पंडितराव, मारुती पाटील, डी. के. बोडके, वसंत पाटील, शिवाजी जाधव, शिवाजी पाटील व प्रत्येक वसाहतीचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)बैठकीतील प्रमुख निर्णयडॉ. पाटणकर म्हणाले की, बैठकीत अंबाईवाडा, धनगरवाडा यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे ठरले आहे. कोअर झोनमधील गावांचे सक्तीने पुनर्वसन करावे लागणार आहे. धरणग्रस्त वसाहतीच्या ८ किलोमीटर परिसरातील महसूल विभाग, फॉरेस्ट, गायरान, जादा वाटप केलेली जमीन यांचा कृती आराखडा तयार करावा व त्याची वाटपाची प्रक्रिया १५ मे पर्यंत करावी. त्याचे समान न्यायाने वाटप करण्याचे ठरले.