शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

शांतिसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अब्दुललाट येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन

By admin | Updated: August 28, 2016 00:16 IST

अजित पाटील : ३ सप्टेंबरला शांती सद्भावना रॅली

सांगली : प्रथमाचार्य १०८ शांतिसागरजी महाराज यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबरअखेर कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुललाट येथे कार्यक्रम होणार आहेत. या कालावधित कृषी प्रदर्शन, पीक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेसह शांती सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पाटील यांनी सांगितले की, विसाव्या शतकातील प्रथमाचार्य १०८ शांतिसागरजी महाराज हे एक प्रभावी मुनी होते. त्यांची ६१ वी पुण्यतिथी दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येते. यावर्षी शिरोळ तालुक्यातील अ. लाट येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. या पुण्यतिथी कार्यक्रमात १ सप्टेंबरला महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, २ सप्टेंबरला पाठशाळांतर्गत वक्तृत्व व गीतनृत्य स्पर्धा होणार आहेत. २ व ३ सप्टेंबरला कृषी प्रदर्शन व पीक स्पर्धा होणार असून, वीराचार्य, शांतिसागर व कर्मवीरांच्या जीवन दर्शनाचे प्रदर्शन होणार आहे. ३ सप्टेंबरला शांतीकलशाचे स्वागत व अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता शांतीसद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, याची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी मुख्य कार्यक्रमात कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी एन. जे. पाटील, आदगौंडा पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)