शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शांतिसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अब्दुललाट येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन

By admin | Updated: August 28, 2016 00:16 IST

अजित पाटील : ३ सप्टेंबरला शांती सद्भावना रॅली

सांगली : प्रथमाचार्य १०८ शांतिसागरजी महाराज यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबरअखेर कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुललाट येथे कार्यक्रम होणार आहेत. या कालावधित कृषी प्रदर्शन, पीक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेसह शांती सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पाटील यांनी सांगितले की, विसाव्या शतकातील प्रथमाचार्य १०८ शांतिसागरजी महाराज हे एक प्रभावी मुनी होते. त्यांची ६१ वी पुण्यतिथी दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येते. यावर्षी शिरोळ तालुक्यातील अ. लाट येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. या पुण्यतिथी कार्यक्रमात १ सप्टेंबरला महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, २ सप्टेंबरला पाठशाळांतर्गत वक्तृत्व व गीतनृत्य स्पर्धा होणार आहेत. २ व ३ सप्टेंबरला कृषी प्रदर्शन व पीक स्पर्धा होणार असून, वीराचार्य, शांतिसागर व कर्मवीरांच्या जीवन दर्शनाचे प्रदर्शन होणार आहे. ३ सप्टेंबरला शांतीकलशाचे स्वागत व अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता शांतीसद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, याची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी मुख्य कार्यक्रमात कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी एन. जे. पाटील, आदगौंडा पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)