शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला हिराबाग वाॅटर वर्क्समधील जलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला हिराबाग वाॅटर वर्क्समधील जलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या सूचना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. सांगली व कुपवाड शहरातील सर्व भागात किमान २ ते ३ तास मुबलक व पूर्ण क्षमतेने पाणी मिळेल यासाठी योग्य नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्याबाबत महापौरांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संजय मेंढे, सागर घोडके, मनगुआबा सरगर, मंगेश चव्हाण, नगरसेविका संगीता हारगे, नर्गिस सय्यद, नसिमा नाईक, स्थाती पारधी, अमर निंबाळकर, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, शाखा अभियंता आनंदा वाघमारे, कनिष्ठ अभियंता मुलाणी आदी उपस्थित होते.

सांगली व कुपवाड शहरातील पाणी वितरणचा सखोल आढावा महापौर सूर्यवंशी यांनी यावेळी घेतला. गेल्या काही महिन्यांपासून हिराबाग वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आला आहे. तो तात्काळ सुरू करावा. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील बऱ्याच पाण्याच्या टाक्यांचे खाली २ ते ३ मुख्य पाइपलाइन जोडण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी नव्या जलवाहिन्यांना नळ कनेक्शन जोडून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

सूर्यवंशी म्हणाले, सांगली व कुपवाड शहरात सर्व भागात किमान २ ते ३ तास मुबलक व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा झाला पाहिजे याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे. त्यासाठी पाइप इन्सेक्टरने ग्रुप तयार करून संबंधित व्हॉल्व्हमन व भागातील सदस्यांचा समावेश करावा. दररोज तक्रारी निकालात काढाव्यात.

चौकट

मिरजेत २४ रोजी बैठक

मिरज शहरातील पाणीपुरवठ्याबाबतही नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली; परंतु काही नगरसेवक व अधिकारी उपस्थित नसल्याने याबाबत मिरज विभागीय कार्यालयात येत्या २४ मार्च रोजी बैठक होणार असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.