शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला हिराबाग वाॅटर वर्क्समधील जलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला हिराबाग वाॅटर वर्क्समधील जलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या सूचना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. सांगली व कुपवाड शहरातील सर्व भागात किमान २ ते ३ तास मुबलक व पूर्ण क्षमतेने पाणी मिळेल यासाठी योग्य नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्याबाबत महापौरांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संजय मेंढे, सागर घोडके, मनगुआबा सरगर, मंगेश चव्हाण, नगरसेविका संगीता हारगे, नर्गिस सय्यद, नसिमा नाईक, स्थाती पारधी, अमर निंबाळकर, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, शाखा अभियंता आनंदा वाघमारे, कनिष्ठ अभियंता मुलाणी आदी उपस्थित होते.

सांगली व कुपवाड शहरातील पाणी वितरणचा सखोल आढावा महापौर सूर्यवंशी यांनी यावेळी घेतला. गेल्या काही महिन्यांपासून हिराबाग वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आला आहे. तो तात्काळ सुरू करावा. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील बऱ्याच पाण्याच्या टाक्यांचे खाली २ ते ३ मुख्य पाइपलाइन जोडण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी नव्या जलवाहिन्यांना नळ कनेक्शन जोडून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

सूर्यवंशी म्हणाले, सांगली व कुपवाड शहरात सर्व भागात किमान २ ते ३ तास मुबलक व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा झाला पाहिजे याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे. त्यासाठी पाइप इन्सेक्टरने ग्रुप तयार करून संबंधित व्हॉल्व्हमन व भागातील सदस्यांचा समावेश करावा. दररोज तक्रारी निकालात काढाव्यात.

चौकट

मिरजेत २४ रोजी बैठक

मिरज शहरातील पाणीपुरवठ्याबाबतही नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली; परंतु काही नगरसेवक व अधिकारी उपस्थित नसल्याने याबाबत मिरज विभागीय कार्यालयात येत्या २४ मार्च रोजी बैठक होणार असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.