शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे पलूस तालुक्यातील काम पूर्ण करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गाचे पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटादरम्यान प्रलंबित काम तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गाचे पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटादरम्यान प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

बैठकीत राष्ट्रीय महामार्ग क्र. २६६ अंतर्गत पलूस तालुक्यातील तुपारी फाटा ते येळावी फाटादरम्यानचे रखडलेले महामार्गाचे काम उपलब्ध जागेत सात मीटर रुंदीने काँक्रिटीकरण करून तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले असून, यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.

डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकारातून तुपारी फाटा ते येळावी फाटादरम्यान महामार्गाची रखडलेच्या कामासंदर्भात चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, राष्ट्रीय महामार्ग सचिव विनय देशपांडे तसेच अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी भाग घेतला. पलूस तहसील कार्यालयातून जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, जे. के. बापू जाधव, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, वैभवराव पुदाले, आदी उपस्थित होते.

विजापूर - गुहागर महामार्गाचे पलूस तालुक्यातील १६ कि.मी. अंतराचे काम रखडले आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या मार्गावर सतत लहान-मोठे अपघात होत आहेत. अपघातात काहीजणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी भूमिका डॉ. कदम यांनी यावेळी मांडली.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यावर न्यायालय जो निर्णय देईल, त्याला अधीन राहून त्याप्रमाणे भविष्यात काम करता येईल, मात्र तोपर्यंत थांबून चालणार नाही. सध्या उपलब्ध जागेत सात मीटर रुंदीने तत्काळ रखडलेले काम सुरू करावे. तुपारी फाटा आणि येळावी फाटा या दोन्ही बाजूंकडून काम सुरू करावे. म्हणजे काम लवकर पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. यासाठी शेतकरी, नागरिक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.