शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूजेबाबत निवडणुकीनंतर आदेश

By admin | Updated: January 29, 2017 23:09 IST

रावसाहेब दानवे : सागाव येथे उदयसिंह नाईक गटाचा भाजपमध्ये प्रवेश

मांगले : शिराळ्याची जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा आचारसंहिता संपताच अध्यादेश काढून पुन्हा सुरु करण्यात येईल, असे आश्वासन देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.सागाव (ता. शिराळा) येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदयसिंह नाईक, शोभाताई नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, जिल्हा परिषद सदस्या वैशाली नाईक, अ‍ॅड. करणसिंह चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दानवे म्हणाले, भाजप सरकारने पीकविम्याची पध्दत बदलली. खतांच्या किमती पाच वर्षे स्थिर ठेवल्या. दारिद्र्यरेषेतील कुटुंबांना केवळ शंभर रुपयात गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली आहे. याचा लाभ जनता घेत आहे. राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवून शेकडो गावे दुष्काळमुक्त केली आहेत. भाजप सरकारने ६८ वर्षे शेतकऱ्यांनी सहन केलेली अन्यायी आणेवारी पध्दत आम्ही एका वर्षात बदलून, ३३ टक्के आणेवारी असणारी गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची योजना आणली. शेतकऱ्यांना दीडपट जादा मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही कागदावरचे नाही, तर जातीवंत शेतकरी आहोत.शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यात वैचारिक क्रांती झाली असून, सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. आगामी सर्व निवडणुकांत भाजपचीच सत्ता येईल. यावेळी रणजितसिंह नाईक, शोभाताई नाईक यांनी विश्वासराव नाईक यांनी स्थापन केलेल्या साखर कारखान्याच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, नानासाहेब महाडिक, जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, नीता केळकर, गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, निशिकांत पाटील, विक्रम पाटील, प्रल्हाद पाटील, अतुल भोसले, रवी अनासपुरे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर उपस्थित होते. (वार्ताहर)खुर्ची आणि संजयकाका...आमदार शिवाजीराव नाईक यांचे भाषण सुरु असताना खासदार संजय पाटील यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांना बसायला खुर्ची नव्हती. संयोजकांनी खुर्ची आणून दिली. ती मध्येच काढून घेत संजयकाका मंत्रीमहोदयांकडे निघाले. त्यावेळी चंद्रकांतदादा व दानवेंनी, ‘खुर्ची ठेवा, इकडे या, इथे शिवाजीरावांची खुर्ची आहे’, असे सांगितले. त्यावेळी ‘नको, खुर्चीच घेऊन येतो’ असे संजयकाका म्हणाले. हे ऐकून शिवाजीराव नाईक यांनी ध्वनिक्षेपकावरूनच, ‘खासदारसाहेब, खुर्ची सोडायची नाही’ अशी जाहीर टिपणी केल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. मासे आणि भाजपचे खतरनाक जाळे सांगली जिल्ह्यात भाजपचा कार्यकर्ता दुर्बिणीतूनसुध्दा सापडत नव्हता, मात्र एक खासदार व चार आमदार गेल्यावेळेस आमच्या फासक्यात सापडले. आमच्या नजरेत भरला तर तो भाजपमध्ये आलाच म्हणून समजा. याचे श्रेय चंद्रकांतदादांना जाते. भाजपचे जाळे खतरनाक असून, त्यामध्ये अनेक मासे आत्तापर्यंत सापडले आहेत, अशी मिश्किलीही रावसाहेब दानवे यांनी केली.