शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या पाणीबाणीला वारणेचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 23:53 IST

योजनेस ८२ कोटींची गरज : पाण्यावर आजअखेर ७५ कोटी खर्च होऊनही शहरावर टंचाईचे सावट --लोकमत विशेष

शीतल पाटील-- सांगली --बारमाही वाहणारी कृष्णा नदी शहरालगत असताना, गेले चार दिवस सांगलीकरांची पाण्यासाठी धावाधाव झाली. नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली. कमी झालेले पर्जन्य, कोयनेतील अपुरा पाणीसाठा, टेंभू व ताकारीसारख्या मोठ्या सिंचन योजनांसाठी होणारा पाणी उपसा यामुळे सांगलीतील कृष्णा नदी कोरडी पडू लागली आहे. त्यासाठी पुन्हा वारणा पाणी योजनेचा पर्याय विचारात घेण्याची गरज आहे. पण आता वारणा योजनाही मोठी खर्चिक झाली आहे. वारणेतून पाणी आणण्यासाठी ८२ कोटींची गरज आहे. त्यासाठी पालिकेतील सत्ताधारी, विरोधकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ताकाळात वारणा नदीतून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणी पुरवठा करणारी योजना आखण्यात आली. तत्कालीन केंद्र शासनाने ‘युआयडीएसएसएमटी’अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बळकटीसाठी ७९.०२ कोटींच्या योजनेला मंजुरी दिली. पण पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली अन् मदन पाटील यांची सत्ताही गेली. त्यामुळे वारणा योजनेचे काम रखडले. नव्याने सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने योजनेची कामे हाती घेतली. वारणा उद्भव वगळून शहरातील वितरण व्यवस्था बळकटीकरणावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यातील निधीतून जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने कुपवाड झोनमधील कापसे वसाहत, शामनगर, गव्हर्मेंट कॉलनीमधील तीन उंच टाक्या, सहा हजार ५०० मीटरच्या वितरण व्यवस्थेची कामे झाली. यातून सुमारे ३५ हजार नागरिकांना पाण्याचा लाभ मिळू लागला आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेकडील थकबाकीचे साडेचार कोटी पालिकेला प्राप्त झाले, तर तिसऱ्या टप्प्यात केंद्राने २०.६२ कोटीचा निधी दिला. यातून जॅकवेल ते माळबंगल्यापर्यंतची दाबनलिका, पाच उंच टाक्या, गुरुत्वनलिका, १०२ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था, वानलेसवाडी व वाघमोडेनगर येथे पाण्याची टाकी अशी सुमारे ३५ कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. केंद्राने चौथा टप्पा म्हणून ३५ कोटींचा निधी पालिकेला दिला आहे. महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आजअखेर पाणीपुरवठा यंत्रणेवर ७५ कोटी खर्च केले आहेत. महाआघाडीने मूळ वारणा योजनेला बगल देऊन कृष्णेतूनच पाणी उचलण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पालिकेतील सत्तांतरानंतर पुन्हा एकदा वारणेचा विषय ऐरणीवर आला आहे. पण नंतर हा विषयही मागे पडला.गेल्या आठवड्यात कृष्णा नदी पुन्हा कोरडी पडली. नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला. कोयनेतून पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले; पण आठ दिवस झाले तरी सांगलीत पाणी पोहोचले नाही. नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली. निम्म्याहून अधिक सांगली तहानलेली होती. अखेर शनिवारी नदीपात्रात पाणी आल्याने सांगलीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण हे संकट इथेच थांबलेले नाही. भविष्यात अशी स्थिती पुन्हा उद्भवणार नाही, याची कोणालाच खात्री नाही. त्यासाठी वारणा नदीतून पाणी उचलणे हा एक पर्याय आहे. पूर्वी त्यावर बरीच चर्चा झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या भरोसेच राहणार योजनेचे भविष्यमध्यंतरी पाणीपुरवठा विभागाने वारणा योजनेचा सुधारित आराखडा तयार केला आहे. समडोळी (ता. मिरज) येथील वारणा नदीवर इंटकवेल, जॅकवेल, पंप व संपगृह व साडेअकरा किलोमीटरची वितरण नलिका असा सुमारे ८२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य व केंद्र शासनाने या योजनेसाठी वाढीव निधी देण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. निधीचे दरवाजे बंद झाल्याने वारणेसाठी ८२ कोटी रुपये उभे करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर आहे. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता, ही रक्कम स्वनिधीतून खर्च करणे शक्य नाही. त्यासाठी केंद्र अथवा राज्य शासनाकडेच पदर पसरावा लागणार आहे.