शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

विरोधकांनी हुरळून जाऊ नये : दमयंतीराजे

By admin | Updated: February 24, 2017 23:44 IST

विरोधकांनी हुरळून जाऊ नये : दमयंतीराजे

सातारा : ‘तालुक्यात गटातील आणि गणातील मिळून एकूण ३० जागांवर लढत होऊन, सातारा विकास आघाडी आणि पुरस्कृत उमेदवार एकूण १४ ठिकाणी निवडून आले आहेत. तर विरोधकांचे एकूण १६ उमेदवार निवडून आलेले आहेत. याचाच अर्थ जनतेने थोड्या फार फरकाने समान कौल दिला आहे. १४ आणि १६ मध्ये संख्यात्मक फार मोठा फरक नाही, त्यामुळे विजयी उमेदवारांनी विकासासाठी संपूर्ण योगदान द्यावे’ असे प्रतिपादन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका अध्यक्षा दमयंतीराजे भोसले यांनी केले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दमयंतीराजे भोसले यांनी म्हटले आहे की, ‘सातारा तालुक्यातील जनतेने उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडी व मित्रपक्ष असे एकूण पाच गटांच्या आणि ९ गणांच्या उमेदवारांना विजयी केले. तर विरोधी उमेदवारांना एकूण पाच गटांत आणि ११ गणांमध्ये विजयी केले आहे. म्हणजेच एकूण ३० जागांपैकी ‘साविआ’ आणि मित्रपक्ष मिळून १४ जागांवर तर विरोधकांनी एकूण १६ जागांवर विजय मिळवला आहे. १४ आणि १६ यामधील आकड्यांमध्ये संख्यात्मक फार मोठा फरक आहे असे नाही, त्यामुळे जनतेने दिलेला कौल हा सातारा विकास आघाडीच्या विरोधात दिला आहे, असा अन्वयार्थ कुणी काढू नये. एक-दोन जागांवर आम्ही कमी पडलो; पण जनेतेने झिडकारले वगैरे असे काहीही नाही. त्यामुळे विरोधकांनीही फार हुरळून न जाता, जनतेने आता संधी दिली आहे तर सगळ्यात चांगले काम करून दाखवणे आवश्यक आहे.यापुढे दडपशाही, मारामाऱ्या, गोंधळ, सूड उगवणे, खोट्या केसेस या प्रकारांना पायबंद घातला जाणे विरोधकांकडून अपेक्षित आहे. घराण्याला हे प्रकार शोभादायक नाहीत. जनतेचा सर्वांगीण विकास याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून, विकासाची संकल्पना यापुढे राबविली गेली पाहिजे तरच लोकशाही बळकट आणि समृद्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. असेही दमयंतीराजे यांनी शेवटी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)