शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दिल्लीतील आंदोलनात विरोधी पक्ष बांडगुळासारखे घुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST

ते म्हणाले की, विरोधक शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे. वास्तविक नवीन विधेयकांनी बाजार समितीची मक्तेदारी मोडली ...

ते म्हणाले की, विरोधक शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे. वास्तविक नवीन विधेयकांनी बाजार समितीची मक्तेदारी मोडली जाणार आहे, शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचे स्वातंत्र्य दिले आहे. सेस, हमाली, तोलाई, वाहतूक अशी लूट नसेल. अडते, व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघेल. फार्मिंग कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात, हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. कारण, शेतीशी नव्हे, तर शेतमालाशी करार होणार आहे. कंपन्या चांगले बियाणे, खते, अवजारे यात गुंतवणूक करतील. शेतकऱ्यांच्या बांधावरून माल खरेदी करतील. फसवणूक झाली, तर लवादाकडे तक्रार करा, कंपनीला दंड होईल. महाराष्ट्रात हा कायदा २००६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लागू केला होता. त्यांचाच पक्ष त्याला विरोध करतोय.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर आदी उपस्थित होते.

चौकट

अशी असेल यात्रा

अदानी, अंबानी यांच्या नावे भुताची भीती घालू नका. शेतकऱ्याचा एक गुंठाही या उद्योजकांचा होणार नाही. हमीभावाने खरेदी सुरूच राहील आणि शेतकऱ्यांचे हितच साधले जाईल. हे सारे आम्ही शेतकऱ्यांना सांगण्यासाठी यात्रा करणार आहोत. रयत क्रांती संघटना आणि भारतीय किसान मोर्चातर्फे दि. २४ डिसेंबरला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे आमदार आशिष शेलार यांच्याहस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन, तेथून वाळवा, मिरज, शिरोळ तालुक्‍यांतील गावांचा प्रवास करत इचलकरंजीत सायंकाळी सात वाजता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सभा होईल. दि. २५ व २६ रोजी पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा तालुक्‍यांत दौऱ्यानंतर दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता होईल.