शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारी बंद पडण्याच्या भीतीपोटी कृषी कायद्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सर्व जोखडातून मुक्त करणारे कृषी कायदे केले. पहिल्यांदा या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सर्व जोखडातून मुक्त करणारे कृषी कायदे केले. पहिल्यांदा या कायद्याच्या अध्यादेशाला मान्यता देणारे राज्य सरकार आपली दुकानदारी बंद पडेल, या भीतीपोटी या कायद्याला विरोध करण्याची दुटप्पी भूमिका घेत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

येथील गांधी चौकात केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाच्या समर्थनात काढण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, धनंजय महाडिक, अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात भाजीपाला नियमनमुक्त केला. तसेच शेतकऱ्याचा माल हमीभावापेक्षा कमी दराने कोणी खरेदी केला तर त्याला कारावास करण्याचे विधेयक आणले होते. त्याला कॉँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला. २००६ पासून राज्यात करार शेतीचा कायदा आहे. आतापर्यंत कराराची शेतजमीन अदानी-अंबानी यांनी घेतली का? सध्याच्या राज्यकर्त्यांना मोदी सरकारवर कुठेलच आरोप करता येत नाहीत. त्यामुळे ते जनतेला फसवित आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंजाबच्या मूठभर शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता मोदी घेत आहेत. एका बाजूने शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करायचे आणि कायद्याला विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, फडणवीस सरकारने राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला होता, तो अधिकार या महाविकास आघाडी सरकारने का दिला नाही? शेतकऱ्यांवर गोळ्या चालवून कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे हात रक्ताने बरबटले आहेत.

माजी आमदार सुरेश हाळवणकर, गोपीचंद पडळकर, सागर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले. यात्रेचे निमंत्रक राहुल महाडिक यांनी स्वागत केले. नगरसेवक अमित ओसवाल यांनी आभार मानले. यावेळी मकरंद देशपांडे, संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बॅँकेचे संचालक सी. बी. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, धीरज सूर्यवंशी, नगरसेवक विक्रम पाटील, दीपक शिंदे, कपिल ओसवाल, विजय कुंभार, प्रसाद पाटील उपस्थित होते.