शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

दुकानदारी बंद पडण्याच्या भीतीपोटी कृषी कायद्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सर्व जोखडातून मुक्त करणारे कृषी कायदे केले. पहिल्यांदा या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सर्व जोखडातून मुक्त करणारे कृषी कायदे केले. पहिल्यांदा या कायद्याच्या अध्यादेशाला मान्यता देणारे राज्य सरकार आपली दुकानदारी बंद पडेल, या भीतीपोटी या कायद्याला विरोध करण्याची दुटप्पी भूमिका घेत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

येथील गांधी चौकात केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाच्या समर्थनात काढण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, धनंजय महाडिक, अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात भाजीपाला नियमनमुक्त केला. तसेच शेतकऱ्याचा माल हमीभावापेक्षा कमी दराने कोणी खरेदी केला तर त्याला कारावास करण्याचे विधेयक आणले होते. त्याला कॉँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला. २००६ पासून राज्यात करार शेतीचा कायदा आहे. आतापर्यंत कराराची शेतजमीन अदानी-अंबानी यांनी घेतली का? सध्याच्या राज्यकर्त्यांना मोदी सरकारवर कुठेलच आरोप करता येत नाहीत. त्यामुळे ते जनतेला फसवित आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंजाबच्या मूठभर शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता मोदी घेत आहेत. एका बाजूने शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करायचे आणि कायद्याला विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, फडणवीस सरकारने राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला होता, तो अधिकार या महाविकास आघाडी सरकारने का दिला नाही? शेतकऱ्यांवर गोळ्या चालवून कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे हात रक्ताने बरबटले आहेत.

माजी आमदार सुरेश हाळवणकर, गोपीचंद पडळकर, सागर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले. यात्रेचे निमंत्रक राहुल महाडिक यांनी स्वागत केले. नगरसेवक अमित ओसवाल यांनी आभार मानले. यावेळी मकरंद देशपांडे, संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बॅँकेचे संचालक सी. बी. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, धीरज सूर्यवंशी, नगरसेवक विक्रम पाटील, दीपक शिंदे, कपिल ओसवाल, विजय कुंभार, प्रसाद पाटील उपस्थित होते.