शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

दुकानदारी बंद पडण्याच्या भीतीपोटी कृषी कायद्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सर्व जोखडातून मुक्त करणारे कृषी कायदे केले. पहिल्यांदा या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सर्व जोखडातून मुक्त करणारे कृषी कायदे केले. पहिल्यांदा या कायद्याच्या अध्यादेशाला मान्यता देणारे राज्य सरकार आपली दुकानदारी बंद पडेल, या भीतीपोटी या कायद्याला विरोध करण्याची दुटप्पी भूमिका घेत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

येथील गांधी चौकात केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाच्या समर्थनात काढण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, धनंजय महाडिक, अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात भाजीपाला नियमनमुक्त केला. तसेच शेतकऱ्याचा माल हमीभावापेक्षा कमी दराने कोणी खरेदी केला तर त्याला कारावास करण्याचे विधेयक आणले होते. त्याला कॉँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला. २००६ पासून राज्यात करार शेतीचा कायदा आहे. आतापर्यंत कराराची शेतजमीन अदानी-अंबानी यांनी घेतली का? सध्याच्या राज्यकर्त्यांना मोदी सरकारवर कुठेलच आरोप करता येत नाहीत. त्यामुळे ते जनतेला फसवित आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंजाबच्या मूठभर शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता मोदी घेत आहेत. एका बाजूने शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करायचे आणि कायद्याला विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, फडणवीस सरकारने राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला होता, तो अधिकार या महाविकास आघाडी सरकारने का दिला नाही? शेतकऱ्यांवर गोळ्या चालवून कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे हात रक्ताने बरबटले आहेत.

माजी आमदार सुरेश हाळवणकर, गोपीचंद पडळकर, सागर खोत यांनीही मनोगत व्यक्त केले. यात्रेचे निमंत्रक राहुल महाडिक यांनी स्वागत केले. नगरसेवक अमित ओसवाल यांनी आभार मानले. यावेळी मकरंद देशपांडे, संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बॅँकेचे संचालक सी. बी. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, धीरज सूर्यवंशी, नगरसेवक विक्रम पाटील, दीपक शिंदे, कपिल ओसवाल, विजय कुंभार, प्रसाद पाटील उपस्थित होते.