शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

आटपाडीकरांना शुद्ध पाणी मिळू नये, अशी विरोधकांची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

आटपाडी : आटपाडी तालुक्याच्या जनतेची तहान भागविण्यासाठी निर्माण केलेली धनगाव योजना राजकीय द्वेषापोटी बंद पडली. विरोधकांना आटपाडी तालुक्यातील जनतेला ...

आटपाडी : आटपाडी तालुक्याच्या जनतेची तहान भागविण्यासाठी निर्माण केलेली धनगाव योजना राजकीय द्वेषापोटी बंद पडली. विरोधकांना आटपाडी तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळू नये, हीच इच्छा असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केला.

आटपाडी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मठासमोर सभामंडप कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, आटपाडी तालुक्यातील सर्व जनतेसाठी शुद्ध फिल्टरचे पाणी मिळावे, या शुद्ध हेतूने १११ कोटी रुपये असणारी योजना निर्माण करण्यात आली होती. सध्या या योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पंपाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. भिवघाट येथे शुद्धीकरण यंत्रणा उभा करण्यात आली आहे. मात्र काही लोकांनी राजकीय हेवेदाव्यातून ही योजना अमरसिंह देशमुख यांनी मंजूर करून आणल्यामुळेच हेतूपूर्वक बंद पाडण्यात आली आहे.

ते म्हणाले की, टेंभूचे पाणी आटपाडीला मिळाल्याने आता या योजनेची गरज आहे का? असा सवाल केला जात आहे. मात्र माझ्या आटपाडी तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळविण्याचा हक्क आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आटपाडी तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यावेळी ही योजना मंजूर करत असताना अधिकाऱ्यांनीही असाच प्रश्न विचारला होता. पण मी माझ्या तालुक्याच्या जनतेला शुद्ध पाणी पिण्याचा हक्क असल्याचे ठणकावून सांगत योजना मंजूर करून घेतली होती.