शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीकरांना शुद्ध पाणी मिळू नये, अशी विरोधकांची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

आटपाडी : आटपाडी तालुक्याच्या जनतेची तहान भागविण्यासाठी निर्माण केलेली धनगाव योजना राजकीय द्वेषापोटी बंद पडली. विरोधकांना आटपाडी तालुक्यातील जनतेला ...

आटपाडी : आटपाडी तालुक्याच्या जनतेची तहान भागविण्यासाठी निर्माण केलेली धनगाव योजना राजकीय द्वेषापोटी बंद पडली. विरोधकांना आटपाडी तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळू नये, हीच इच्छा असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केला.

आटपाडी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मठासमोर सभामंडप कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, आटपाडी तालुक्यातील सर्व जनतेसाठी शुद्ध फिल्टरचे पाणी मिळावे, या शुद्ध हेतूने १११ कोटी रुपये असणारी योजना निर्माण करण्यात आली होती. सध्या या योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पंपाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. भिवघाट येथे शुद्धीकरण यंत्रणा उभा करण्यात आली आहे. मात्र काही लोकांनी राजकीय हेवेदाव्यातून ही योजना अमरसिंह देशमुख यांनी मंजूर करून आणल्यामुळेच हेतूपूर्वक बंद पाडण्यात आली आहे.

ते म्हणाले की, टेंभूचे पाणी आटपाडीला मिळाल्याने आता या योजनेची गरज आहे का? असा सवाल केला जात आहे. मात्र माझ्या आटपाडी तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळविण्याचा हक्क आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आटपाडी तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यावेळी ही योजना मंजूर करत असताना अधिकाऱ्यांनीही असाच प्रश्न विचारला होता. पण मी माझ्या तालुक्याच्या जनतेला शुद्ध पाणी पिण्याचा हक्क असल्याचे ठणकावून सांगत योजना मंजूर करून घेतली होती.