शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

इस्लामपुरात विरोधकांचे स्वार्थी राजकारण

By admin | Updated: August 29, 2016 00:21 IST

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : ताळमेळ नसल्याने सत्ताधाऱ्यांपुढे डाळ शिजेना

अशोक पाटील, इस्लामपूर :इस्लामपूर पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीची ३० वर्षे सत्ता आहे. त्यांच्याविरोधात विविध आघाड्या निर्माण झाल्या आहेत. परंतु राष्ट्रवादीपुढे विरोधकांची डाळ अद्यापही शिजलेली नाही. सध्या विरोधकांकडे खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक आणि महाडिक गटाची ताकद असूनही स्थानिक पातळीवरील विरोधक स्वार्थी राजकारण करत आहेत. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाचे काहीही देणे-घेणे नाही. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. याशिवाय १ खासदार, १ मंत्री आणि १ आमदार आणि पेठनाक्यावरील महाडिक युवा शक्तीची ताकद आहे. परंतु शहरातील विरोधकांच्यात एकमत नाही. त्यामुळे विरोधकांतील काहींनी सत्ताधाऱ्यांशी अंतर्गत साटेलोटे करुन स्वत:चा स्वार्थ साधण्याचा डाव आखला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी सध्या अज्ञातवासात आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीने सूर्यवंशी यांचे राजकीय अस्तित्व संपविल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सूर्यवंशी यांनी निर्माण केलेली महिला गृहनिर्माण संस्थेची जागा पालिकेने आपल्या ताब्यात घेतली आहे. न्यायालयासमोरील एक भूखंड सूर्यवंशी यांनी खरेदी केला होता. या भूखंडावरही सध्या आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे हा भूखंड सत्ताधाऱ्यांच्याच हितचिंतकांनी आपल्या घशात घातला आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांच्या सर्व नाड्या आवळल्या गेल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांनी बेकायदेशीर भूखंडाविरोधात न्यायालयीन लढा सुरू केला होता. परंतु याचे पुढे काय झाले, हे कोणालाच समजले नाही. आता तर सूर्यवंशी अज्ञातवासातच आहेत. भाजपचे दुसरे नेते विक्रमभाऊ पाटील हे पक्ष पातळीवर विरोधकाची भूमिका बजावत आहेत. राज्य पातळीवर मुंडे घराण्याशी एकनिष्ठ राहून भाजपची ताकद वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्वाभिमानी संघटनेला भाजपमध्ये सामील करण्यासाठी विक्रमभाऊ पाटील यांचे मोठे योगदान आहे. परंतु ते सध्या एकाकी लढत आहेत. त्यांच्या पक्षाचे बाबासाहेब सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांची साथ नसल्याने भाजपची ताकद विखुरल्याचे दिसते. बाबासाहेब अज्ञातवासात असले तरी, विजय कुंभार कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही करताना दिसत नाहीत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी जिल्हा पातळीवर शिवसेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला असला तरी, इस्लामपूर शहरात त्यांची ताकद म्हणावी अशी दिसत नाही. स्वत: नगरसेवक असूनही त्यांनी स्वत:च्या प्रभागात भरीव काम केल्याचे दिसत नाही. केंद्र व राज्यात भाजप- शिवसेना एकत्रित कार्यरत असले तरी, स्थानिक पातळीवर दोघांची तोंडे वेगळ्या दिशेला आहेत. महाडिक युवा शक्तीचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु महाडिक ही बाह्यशक्ती असल्याचे सांगून शहरातील स्थानिक विरोधक तोंडावर एक आणि माघारी एक बोलताना दिसतात. त्यामुळे महाडिक युवा शक्तीने कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, चेतन शिंदे, सोमनाथ फल्ले यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार यांनी वेळोवेळी सत्ताधाऱ्यांना कधी रस्त्यावर उतरून, तर कधी कायद्याने विरोध दर्शवला आहे. त्यांना इतर विरोधांची साथ लाभत नाही. एकूणच सत्ताधाऱ्यांविरोधात कार्यरत असलेल्यांची ताकद मोठी असली तरी, विरोधकांमध्ये एकी होत नसल्याने ती तोकडी पडत आहे. याचाच फायदा वर्षानुवर्षे राष्ट्रवादीने उचलला आहे. आराखड्यात दडलंय काय..! सत्ताधारी राष्ट्रवादीने स्वबळावर इस्लामपूर शहराचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये ५ हजारहून अधिक मालमत्ताधारकांवर अन्याय झाला आहे. तरीही विरोधकांनी याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली नाही. उलट स्वत:चे भूखंड कसे वाचवता येतील, असा स्वार्थीपणा केला. म्हणूनच ‘लोकमत’ने सलग तीन दिवस वृत्तमालिका प्रसिध्द केली होती. परंतु याची साधी दखलही विरोधकांनी घेतली नाही. यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सेटलमेंट असल्याचीच चर्चा नागरिकांतून होताना दिसत आहे.