शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

शेतकऱ्यांच्या निधीबद्दल विरोधकांकडून अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:18 IST

सांगली : शेतकºयांसाठी विविध योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही आमचे सरकार हा निधी पुन्हा ...

सांगली : शेतकºयांसाठी विविध योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही आमचे सरकार हा निधी पुन्हा काढून घेईल, अशी अफवा विरोधक पसरवित आहेत. शेतकºयांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केले.रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्याहस्ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री देशमुख म्हणाले, देशातील १२ कोटी शेतकºयांना योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेचा दोन हजार रूपयांप्रमाणे पहिला हप्ता जिल्ह्यातील २ लाख २७ हजार शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. अल्पभूधारक शेतकºयांना या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षाला ६ हजार रूपयांची मदत केली जाणार आहे. केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला योजना जाहीर केली व महिना होण्याअगोदरच २४ फेब्रुवारीला शेतकºयांच्या खात्यात पैसे पाठविण्यात आले, ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. शेती आणि शेतकरी या दोघांनाही समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द आहे.कृषी यांत्रिकीकरण मोहिमेंतर्गत शेतकºयांना सहा ट्रॅक्टर, एक रोटाव्हेटर व एका हळद कुकरचे पालकमंत्र्यांच्यहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित शेतकºयांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.शेतकरी कर्जमुक्त होणारपालकमंत्री देशमुख म्हणाले, शासनाच्या धोरणामुळे मंजूर झालेला रुपया न् रुपया शेतकºयांच्या हातात मिळत आहे. ही तर सुरूवात आहे. यापेक्षा अधिक सुविधा शेतकºयांसाठी पुरविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या सन्मान योजनेमुळे खासगी सावकारांकडे पैशासाठी जाण्याची गरज नसून बॅँकांमध्येही जावे लागणार नाही. शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचेच धोरण सरकारने अवलंबिले आहे. ते आता सत्यात उतरत आहे.