शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

शेतकऱ्यांच्या निधीबद्दल विरोधकांकडून अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:18 IST

सांगली : शेतकºयांसाठी विविध योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही आमचे सरकार हा निधी पुन्हा ...

सांगली : शेतकºयांसाठी विविध योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही आमचे सरकार हा निधी पुन्हा काढून घेईल, अशी अफवा विरोधक पसरवित आहेत. शेतकºयांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केले.रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्याहस्ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री देशमुख म्हणाले, देशातील १२ कोटी शेतकºयांना योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेचा दोन हजार रूपयांप्रमाणे पहिला हप्ता जिल्ह्यातील २ लाख २७ हजार शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. अल्पभूधारक शेतकºयांना या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षाला ६ हजार रूपयांची मदत केली जाणार आहे. केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला योजना जाहीर केली व महिना होण्याअगोदरच २४ फेब्रुवारीला शेतकºयांच्या खात्यात पैसे पाठविण्यात आले, ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. शेती आणि शेतकरी या दोघांनाही समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द आहे.कृषी यांत्रिकीकरण मोहिमेंतर्गत शेतकºयांना सहा ट्रॅक्टर, एक रोटाव्हेटर व एका हळद कुकरचे पालकमंत्र्यांच्यहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित शेतकºयांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.शेतकरी कर्जमुक्त होणारपालकमंत्री देशमुख म्हणाले, शासनाच्या धोरणामुळे मंजूर झालेला रुपया न् रुपया शेतकºयांच्या हातात मिळत आहे. ही तर सुरूवात आहे. यापेक्षा अधिक सुविधा शेतकºयांसाठी पुरविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या सन्मान योजनेमुळे खासगी सावकारांकडे पैशासाठी जाण्याची गरज नसून बॅँकांमध्येही जावे लागणार नाही. शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचेच धोरण सरकारने अवलंबिले आहे. ते आता सत्यात उतरत आहे.