शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

चांदोलीत केवळ पाऊण टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: June 1, 2016 00:56 IST

विसर्ग सुरूच : वीस दिवसांपासून वीज निर्मिती बंद; धरणातून सध्या १४00 क्युसेक विसर्ग सुरू

शिराळा/वारणावती : सततच्या पाण्याच्या विसर्गामुळे चांदोली (वारणा) धरणात केवळ पाऊण टीएमसी (०.७५) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मृतसंचय साठा ६.८८ टीएमसी आहे, तरीही धरणातून सध्या १४०० क्युसेक विसर्ग सुरूच आहे. कमी पाणीसाठ्यामुळे वीस दिवसांपासून वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे.चांदोली (ता. शिराळा) येथील धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या या परिसरातील हे धरण प्रत्येकवर्षी पूर्ण क्षमतेने भरते. पण गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने ते ९० टक्के भरले होते. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्यासाठी, तसेच सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ व वाकुर्डे योजनेसाठी या धरणातून नियमित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील ६.८८ टीएमसी मृतसंचय पाणीसाठा सोडून केवळ ०.७५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. दुष्काळी भागाला जलसंजीवनी देणाऱ्या या धरणातील पाणी पातळी वेगाने कमी झाली आहे.या धरणामध्ये मागीलवर्षी या कालावधित १२.३३ टीएमसी पाणी पातळी होती. यंदा ती अधिक खालावली आहे. यामुळे वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. सध्या धरणातून सिंचनासाठी केवळ १४०० क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाणी विसर्ग चालू आहे. (वार्ताहर)३२ पाझर तलाव कोरडेचांदोली धरणातील पाणी योजनेतून शिराळा तालुक्यातील मोरणा धरणाच्या कार्यक्षेत्रात पाणी मिळाले आहे. असे असले तरी, सध्या तालुक्यातील ३२ पाझर तलाव कोरडे आहेत, तर मोरणा धरणात वाकुर्डे योजनेचे पाणी आले आहे. शिवणी, रेठरेधरण ही धरणे पूर्ण कोरडी पडली आहेत. चार गावांमध्ये सध्या टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चांदोली धरणापासून २५० फुटांवर असणाऱ्या कालव्याला महिन्याभरापूर्वी पडलेले भगदाड मुजवून तेथे भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.२२ मीटर लांबीच्या आरसीसी भिंतीचे काम पूर्णत्वास येत आहे. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हे भगदाड पडले होते. नवीन भिंतीमुळे पाण्याचा वेग नियंत्रित होण्यास मदत होईल. हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.