शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चांदोलीत केवळ पाऊण टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: June 1, 2016 00:56 IST

विसर्ग सुरूच : वीस दिवसांपासून वीज निर्मिती बंद; धरणातून सध्या १४00 क्युसेक विसर्ग सुरू

शिराळा/वारणावती : सततच्या पाण्याच्या विसर्गामुळे चांदोली (वारणा) धरणात केवळ पाऊण टीएमसी (०.७५) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मृतसंचय साठा ६.८८ टीएमसी आहे, तरीही धरणातून सध्या १४०० क्युसेक विसर्ग सुरूच आहे. कमी पाणीसाठ्यामुळे वीस दिवसांपासून वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे.चांदोली (ता. शिराळा) येथील धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या या परिसरातील हे धरण प्रत्येकवर्षी पूर्ण क्षमतेने भरते. पण गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने ते ९० टक्के भरले होते. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्यासाठी, तसेच सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ व वाकुर्डे योजनेसाठी या धरणातून नियमित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील ६.८८ टीएमसी मृतसंचय पाणीसाठा सोडून केवळ ०.७५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. दुष्काळी भागाला जलसंजीवनी देणाऱ्या या धरणातील पाणी पातळी वेगाने कमी झाली आहे.या धरणामध्ये मागीलवर्षी या कालावधित १२.३३ टीएमसी पाणी पातळी होती. यंदा ती अधिक खालावली आहे. यामुळे वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. सध्या धरणातून सिंचनासाठी केवळ १४०० क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाणी विसर्ग चालू आहे. (वार्ताहर)३२ पाझर तलाव कोरडेचांदोली धरणातील पाणी योजनेतून शिराळा तालुक्यातील मोरणा धरणाच्या कार्यक्षेत्रात पाणी मिळाले आहे. असे असले तरी, सध्या तालुक्यातील ३२ पाझर तलाव कोरडे आहेत, तर मोरणा धरणात वाकुर्डे योजनेचे पाणी आले आहे. शिवणी, रेठरेधरण ही धरणे पूर्ण कोरडी पडली आहेत. चार गावांमध्ये सध्या टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चांदोली धरणापासून २५० फुटांवर असणाऱ्या कालव्याला महिन्याभरापूर्वी पडलेले भगदाड मुजवून तेथे भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.२२ मीटर लांबीच्या आरसीसी भिंतीचे काम पूर्णत्वास येत आहे. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हे भगदाड पडले होते. नवीन भिंतीमुळे पाण्याचा वेग नियंत्रित होण्यास मदत होईल. हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.