शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांना आत्मविश्वासच यशापर्यंत पोहोचवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:27 IST

कामेरी : ध्येयवाद व आत्मविश्वास हाच गुण ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्वोच्च यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतात. त्यांची आर्थिक परिस्थिती, दारिद्र्य व व्यंगत्व ...

कामेरी : ध्येयवाद व आत्मविश्वास हाच गुण ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्वोच्च यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतात. त्यांची आर्थिक परिस्थिती, दारिद्र्य व व्यंगत्व हे विद्यार्थ्याच्या यशात अडचण निर्माण करू शकत नाही, असे मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रवी बावडेकर यांनी व्यक्त केले.

कामेरी (ता. वाळवा) येथे कर्मवीर शिक्षण संस्थेच्या सुनंदा जाधव कन्या ज्युनिअर कॉलेज येथे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या कुमारी धनश्री माळी, स्नेहल खराडे व प्रियांका खरात या विद्यार्थिनींच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवी अशोक नीळकंठ हे होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान कदम, सिनेअभिनेते व चित्रपट निर्माते विलास रकटे यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी सीमा सुरक्षा बल व बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये निवड झालेल्या या विद्यार्थिनींनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत परिस्थितीवर कशी मात करता येते व यश संपादन करता येते हे सांगून मुलींना प्रेरणा दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. अनिल पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भगवान कदम, प्रा. संजय पाटील, प्रा. सुधीर खंडागळे, प्रा. सारिका पाटील, प्रा. भारती पाटील, मुख्याध्यापिका शैला पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक हंबीराव जेडगे, वैभव पाटील, अतुल कदम उपस्थित होते. सुधीर खंडागळे व प्रा. सुधीर खंडागळे यांनी स्वागत केले. प्रा. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा पाटील हिने आभार मानले

फोटो - १००२२०२१-आयएसएलएम-कामेरी न्यूज

कामेरी येथील कन्या ज्युनिअर कॉलेज येथे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या धनश्री माळी, स्नेहल खराडे व प्रियांका खरात या विद्यार्थिनींचा सत्कार विलास रकटे, रवी बावडेकर, भगवान पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक नीळकंठ, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते.