शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

राज्याच्या बजेटमध्ये सांगलीला ठेंगाच!-‘गदिमा’ स्मारकासाठी केवळ तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:12 IST

सांगली : शेटफळे (ता. आटपाडी) येथे साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यापलिकडे राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीला ठेंगाच मिळाला. अपूर्ण सिंचन योजना, शेती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्षारपड जमिनीसह यांच्यासाठी ठोस तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले.आशिया खंडातील सर्वांत मोठी उपसा सिंचन योजना म्हणून टेंभू योजनेची ओळख आहे. ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे ...

ठळक मुद्दे अपूर्ण सिंचन योजना; शेती, उद्योगासाठी भरीव निधीचा अभाव

सांगली : शेटफळे (ता. आटपाडी) येथे साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यापलिकडे राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीला ठेंगाच मिळाला. अपूर्ण सिंचन योजना, शेती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्षारपड जमिनीसह यांच्यासाठी ठोस तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले.

आशिया खंडातील सर्वांत मोठी उपसा सिंचन योजना म्हणून टेंभू योजनेची ओळख आहे. ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे या योजनाही शेतकºयांच्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या योजना गेल्या वीस वर्षांपासून अपूर्ण आहेत. शेतकºयांच्या दृष्टीने त्यांची शंभर टक्के कामे पूर्ण होण्याची गरज आहे. जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार आणि एक खासदार असल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पातअपूर्ण सिंचन योजनांसाठी विशेष निधी मिळेल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती; पण याही सरकारने शेतकºयांची निराशाच केल्याच्या जाणकारांच्या प्रतिक्रिया आहेत. शेतीचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली आहे; पण त्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नसल्याबद्दलही शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कोणताही नवीन उद्योग नाही. शासकीय रुग्णालयासाठी निधीची गरज असूनही त्यासाठीही तरतूद नसल्याचे दिसून आले.थोडी खुशीस्पर्धा परीक्षा केंद्राच्या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागतराज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदीचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी स्वागत करीत या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.ग्रामीण भागाला चालना देणारा अर्थसंकल्प : संग्रामसिंह देशमुखगाव आणि खेड्यांच्या विकासासाठी नवनवीन योजनांव्दारे भरीव तरतूद करीत ग्रामीण भागाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शेतकºयांना दिलासा, उद्योजकांना बळ, विद्यार्थ्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जलयुक्त शिवारसाठी पंधराशे कोटीची तरतूद करण्यात आल्याने मागेल त्याला शेततळे मिळेल. शेतकºयांच्या वीजजोडणीचा प्रश्न गंभीर होता, त्यासाठी ७५० कोटी रुपये मिळणार आहेत.थोडी नाराजीजिल्ह्यातील शेतकºयांसह सामान्यांची निराशाच : संजय कोलेकेंद्र आणि राज्य सरकारच्या अंदाजपत्रकांमध्ये शेतकºयांसाठी फार देत असल्याच्या केवळ गोड गोड घोषणाच केल्या आहेत. शेतीसाठी ठोस काहीच तरतूद केलेली नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे; पण उत्पन्न दुप्पट कसे होणार, याबाबतचे काहीच स्पष्टीकरण नसल्यामुळे त्यांच्या घोषणेला काहीच अर्थ नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी केली.राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ पोकळ घोषणा : महेश खराडेजिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजनांसह शेतकºयांच्या हितासाठी राज्य सरकारकडून ठोस निधीची तरतूद अपेक्षित होती; पण अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास शेतकºयांची निराशाच झाली आहे. शेतीमाल प्रक्रियेसाठी केवळ ५० कोटी मिळणार आहेत. शेततळी, कृषी उद्योगांसाठीही फारशी तरतूद नसल्यामुळे शेतकरी, सामान्य जनतेच्यादृष्टीने अर्थसंकल्प फेल ठरला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी केली.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पSangliसांगली