शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

जत तालुक्याचा पाणी प्रश्न जयंत पाटीलच सोडवू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

जत : स्व. राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते की दुष्काळी जत तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ...

जत : स्व. राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते की दुष्काळी जत तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हैशाळ योजनेपासून वंचित ६५ गावांच्या विस्तारित योजनेसाठी सहा टीएमसी पाणी मंजूर केले. त्यांचा हा निर्णय शेतकऱ्यांना समृद्ध करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब, माजी नगरसेवक भय्या कुलकर्णी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी, प्रकाश व्हनमाने, योगेश व्हनमाने, दयगोंडा बिराजदार, माजी सरपंच नशीर मुल्ला आदी उपस्थित होते.

जमदाडे म्हणाले, विस्तारित योजनेच्या मंजुरीसाठी आम्ही सर्वांनी प्रांत कार्यालयासमोर पदाधिकारी व शेतकऱ्यांसोबत उपोषण केले होते. सततचा पाठपुरावा व जनमताचा आदर करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणी उपलब्धतेसाठी खूप प्रयत्न केले होते. लोकनेते कै. राजारामबापू यांनी उमदीपर्यंत केलेली पदयात्रा व त्यांचे तालुक्यावर असणारे विशेष प्रेम यामुळे त्यानी जिद्दीने सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले आहे.

बसवराज पाटील म्हणाले, स्वर्गीय बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंत पाटील यांनी जत तालुक्यात लक्ष घालण्यासाठी आम्ही सर्वांनी साकडे घातले. सहा टीएमसी पाणी मंजूर करून विस्तारित म्हैसाळ योजनेला मंजुरी दिली आहे. भविष्यात अशाच प्रकारचे प्रश्न सोडविण्याची धमक जयंत पाटील यांच्यातच आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, मार्केट कमिटी, नगर परिषद या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी ताकद उभी करावी लागणार आहे.

चौकट

जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार?

जत तालुक्यातील विस्तारित पाणी योजनेचा ज्वलंत पाणी प्रश्न होता. या संदर्भात जयंत पाटील यांच्याकडे जतच्या सर्वच नेत्यांनी पाठपुरावा केला होता. पाटील यांनी विस्तारित पाणी योजनेला सहा टीएमसी पाणी मंजूर केल्याने दुष्काळी भागातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात भाजप, जनस्वराज, काँग्रेस पक्षातील मातब्बर नेते पक्षप्रवेश करणार असल्याने राजकीय समीकरण बदलणार आहेत.