शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

प्रति एकर केवळ ६० हजार रूपये भरपाई

By admin | Updated: January 19, 2015 00:32 IST

तिकुंडी येथील प्रकार : भू-संपादनास शेतकऱ्यांच्या विरोधामुळे साठवण तलावाचे काम रखडले

दरीबडची : तिकोंडी (ता. जत) येथील साठवण तलावासाठी ९३ शेतकऱ्यांची ७५ एकर ५९ गुंठे जमीन पाच वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली आहे. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीची प्रति एकर फक्त ६० हजार दराने भरपाई मंजूर झाली आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भरपाई कमी आहे. केंद्राने भू-संपादनाच्या भरपाईसाठी नवीन तरतुदी केल्या आहेत. या केलेल्या तरतुदीनुसार बाजारमूल्याच्या चौपट भरपाई देण्याची आहे. यानुसार भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जमिनीची भरपाई कमी असल्याने शेतकऱ्यांकडून स्वीकारली गेली नसल्याने १ कोटी ३४ लाख १४ हजार ४७७ रुपये दोन वर्षांपासून शासनदरबारी पडून आहेत. भरपाईच्या वादात ९३ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. याकडे भू-संपादन विभागाने लक्ष देऊन केंद्राच्या भू-संपादनप्रमाणे नुकसानभरपाई, पुनर्वसन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.स्थानिक स्तर विभाग जलसंधारण महामंडळ, औरंगाबादअंतर्गत तिकोंडी साठवण तलावास २०१० मध्ये प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. तलावाची मूळ रक्कम ५ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. जानेवारी २०११ ला टेंडर काढण्यात आले. टेंडर रक्कम ३ कोटी ५० लाख आहे. हिरवे कन्स्ट्रक्शन, पंढरपूर यांच्याकडून कामाला सुरुवात करण्यात आली. कामाचा कालावधी २४ महिन्यांचा आहे. तलावाची साठवण क्षमता ४८ दक्षलक्ष घनफूट आहे. बुडीत क्षेत्र ३० हेक्टर आहे, तर सांडवा लांबी १४८ मीटर आहे. ओलिताखाली येणारे क्षेत्र २४९ हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी विरोध केल्याने काम गेली चार वर्षे रखडले आहे. सध्या तलावाचे काम २० टक्के झाले आहे.भू-संपादन विभागाने पाच वर्षांपूर्वी जमीन भू-संपादित केली आहे. भू-संपादन ८-अ ची नोटीस पाठविली आहे. त्यानुसार कब्जापट्टी ही करण्यात आली आहे. तलावात घरे, विहीर, कूपनलिका, डाळिंब बाग गेली आहे. बागायत व जिरायत जमीन गेली आहे. ९३ कुटुंबांची घरे गेल्याने ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीचा दर ठरविला असून, त्यानुसार १ कोटी ३४ लाख १४ हजार ४७७ रुपये रक्कम मंजूर झाली आहे. (वार्ताहर)सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ही नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणे भरपाई मिळाली पाहिजे. नाही तर तलाव होऊ देणार नाही. तलावामध्ये आत्मदहन करण्याची तयारी आहे. -मल्लाप्पा बळूर, शेतकरी, तिकोंडीतलावाचे भू-संपादन झाले आहे. कब्जेपट्टी झाली आहे. शासननियमाप्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांनाही सहकार्य करावे. तलावाच्या कामाला सुरुवात होणार आहे.- अभिमन्यू तेली, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, जतबावीस एकराची भरपाई साडेतेरा लाख? तलावासाठी भू-संपादन विभागाने मल्लाप्पा बळूर, विठ्ठल महाजन, यल्लव्वा बळूर, शंकर रायगोंड, सखुबाई महाजन, मडीवाळाप्पा जेऊर यांच्यासह २० शेतकऱ्यांची २२ एकर जमीन १३ लाख ५३ हजार ७२० रुपये दराने संपादन केली आहे. म्हणजेच एकराला फक्त ६० हजार इतकीच भरपाई मंजूर झाली आहे.वीस वर्षांपासून शेतात राहणारे संजीव चन्नाप्पा बळूर या शेतकऱ्याचे पत्र्याचे घर ठेकेदाराने पाडून जमीन सपाट केली आहे. बळूर हे ऊसतोडीला बाहेरगावी गेले होते. गेल्या ४ वर्षांपासून घर नसल्याने कुटुंब घेऊन साबू बळूर यांच्या शेतामध्ये राहात आहेत. बेघर होण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.