शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रति एकर केवळ ६० हजार रूपये भरपाई

By admin | Updated: January 19, 2015 00:32 IST

तिकुंडी येथील प्रकार : भू-संपादनास शेतकऱ्यांच्या विरोधामुळे साठवण तलावाचे काम रखडले

दरीबडची : तिकोंडी (ता. जत) येथील साठवण तलावासाठी ९३ शेतकऱ्यांची ७५ एकर ५९ गुंठे जमीन पाच वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली आहे. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीची प्रति एकर फक्त ६० हजार दराने भरपाई मंजूर झाली आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भरपाई कमी आहे. केंद्राने भू-संपादनाच्या भरपाईसाठी नवीन तरतुदी केल्या आहेत. या केलेल्या तरतुदीनुसार बाजारमूल्याच्या चौपट भरपाई देण्याची आहे. यानुसार भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जमिनीची भरपाई कमी असल्याने शेतकऱ्यांकडून स्वीकारली गेली नसल्याने १ कोटी ३४ लाख १४ हजार ४७७ रुपये दोन वर्षांपासून शासनदरबारी पडून आहेत. भरपाईच्या वादात ९३ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. याकडे भू-संपादन विभागाने लक्ष देऊन केंद्राच्या भू-संपादनप्रमाणे नुकसानभरपाई, पुनर्वसन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.स्थानिक स्तर विभाग जलसंधारण महामंडळ, औरंगाबादअंतर्गत तिकोंडी साठवण तलावास २०१० मध्ये प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. तलावाची मूळ रक्कम ५ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. जानेवारी २०११ ला टेंडर काढण्यात आले. टेंडर रक्कम ३ कोटी ५० लाख आहे. हिरवे कन्स्ट्रक्शन, पंढरपूर यांच्याकडून कामाला सुरुवात करण्यात आली. कामाचा कालावधी २४ महिन्यांचा आहे. तलावाची साठवण क्षमता ४८ दक्षलक्ष घनफूट आहे. बुडीत क्षेत्र ३० हेक्टर आहे, तर सांडवा लांबी १४८ मीटर आहे. ओलिताखाली येणारे क्षेत्र २४९ हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी विरोध केल्याने काम गेली चार वर्षे रखडले आहे. सध्या तलावाचे काम २० टक्के झाले आहे.भू-संपादन विभागाने पाच वर्षांपूर्वी जमीन भू-संपादित केली आहे. भू-संपादन ८-अ ची नोटीस पाठविली आहे. त्यानुसार कब्जापट्टी ही करण्यात आली आहे. तलावात घरे, विहीर, कूपनलिका, डाळिंब बाग गेली आहे. बागायत व जिरायत जमीन गेली आहे. ९३ कुटुंबांची घरे गेल्याने ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीचा दर ठरविला असून, त्यानुसार १ कोटी ३४ लाख १४ हजार ४७७ रुपये रक्कम मंजूर झाली आहे. (वार्ताहर)सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ही नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणे भरपाई मिळाली पाहिजे. नाही तर तलाव होऊ देणार नाही. तलावामध्ये आत्मदहन करण्याची तयारी आहे. -मल्लाप्पा बळूर, शेतकरी, तिकोंडीतलावाचे भू-संपादन झाले आहे. कब्जेपट्टी झाली आहे. शासननियमाप्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांनाही सहकार्य करावे. तलावाच्या कामाला सुरुवात होणार आहे.- अभिमन्यू तेली, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, जतबावीस एकराची भरपाई साडेतेरा लाख? तलावासाठी भू-संपादन विभागाने मल्लाप्पा बळूर, विठ्ठल महाजन, यल्लव्वा बळूर, शंकर रायगोंड, सखुबाई महाजन, मडीवाळाप्पा जेऊर यांच्यासह २० शेतकऱ्यांची २२ एकर जमीन १३ लाख ५३ हजार ७२० रुपये दराने संपादन केली आहे. म्हणजेच एकराला फक्त ६० हजार इतकीच भरपाई मंजूर झाली आहे.वीस वर्षांपासून शेतात राहणारे संजीव चन्नाप्पा बळूर या शेतकऱ्याचे पत्र्याचे घर ठेकेदाराने पाडून जमीन सपाट केली आहे. बळूर हे ऊसतोडीला बाहेरगावी गेले होते. गेल्या ४ वर्षांपासून घर नसल्याने कुटुंब घेऊन साबू बळूर यांच्या शेतामध्ये राहात आहेत. बेघर होण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.