शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: April 8, 2017 00:02 IST

टँकरची मागणीही वाढली : खानापूर, आटपाडी, जत, तासगाव तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई

अशोक डोंबाळे ल्ल सांगलीजिल्ह्यातील मध्यम पाच प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडे ठणठणीत असून मोरणा प्रकल्पात केवळ ११ टक्के पाणीसाठा आहे. लघु ८४ प्रकल्पांपैकी १४ प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित प्रकल्पांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जत, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील बहुतांशी तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे कूपनलिका, विहिरींनी तळ गाठला आहे. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ३१ टँकरद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे.दुष्काळी भागामध्ये परतीचा पाऊस चांगला झाला तरच तेथील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा होतो. या पाणीसाठ्यावर वर्षभर गावातील ग्रामस्थांची आणि पशुधनाची तहान भागत असते. पण परतीचा पाऊस पुरेसा झाला नसल्यामुळे प्रकल्प कोरडेच पडले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठाही कमी होऊ लागला आहे. कूपनलिका आणि विहिरींनी तळ गाठल्यामुळे दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. शेळ्या-मेंढ्यांना पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील मेंढपाळांनी कृष्णा, वारणा नदीकाठाकडे स्थलांतर केले आहे.यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असतानाही पाणी टंचाईची तीव्रता एप्रिलमध्येच जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या ३१ पाणी टँकर सुरू असून मागणीही वाढतच आहे. खानापूर, जत, तासगाव या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या गावांमध्ये टँकरची मागणी वाढू लागली आहे. धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिना बाकी असताना, टँकरची मागणी वाढू लागल्यामुळे प्रशासनही चिंतेत आहे.लघु प्रकल्पांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)तालुकाप्रकल्प संख्याप्रकल्पाची क्षमतासध्याचा पाणीसाठाटक्केतासगाव७७०९.०६१०५.०८१५खानापूर९७१२.४२१८८.४८२६कडेगाव६७१४.६८३००.००४२शिराळा५३५९.०९२७३.३०३४आटपाडी१३१३६७.२८२६७.०७२०जत२८३७१५.२३२१८.९५६क़महांकाळ११९५५.९६६८.७९७मिरज३१४१.८६४४.६५३१वाळवा२५१.८४८.३३१६एकूण८४९४३९.९६१५६०.४४१७