शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

जिल्ह्यात १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: April 8, 2017 00:02 IST

टँकरची मागणीही वाढली : खानापूर, आटपाडी, जत, तासगाव तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई

अशोक डोंबाळे ल्ल सांगलीजिल्ह्यातील मध्यम पाच प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडे ठणठणीत असून मोरणा प्रकल्पात केवळ ११ टक्के पाणीसाठा आहे. लघु ८४ प्रकल्पांपैकी १४ प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित प्रकल्पांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जत, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील बहुतांशी तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे कूपनलिका, विहिरींनी तळ गाठला आहे. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ३१ टँकरद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे.दुष्काळी भागामध्ये परतीचा पाऊस चांगला झाला तरच तेथील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा होतो. या पाणीसाठ्यावर वर्षभर गावातील ग्रामस्थांची आणि पशुधनाची तहान भागत असते. पण परतीचा पाऊस पुरेसा झाला नसल्यामुळे प्रकल्प कोरडेच पडले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठाही कमी होऊ लागला आहे. कूपनलिका आणि विहिरींनी तळ गाठल्यामुळे दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. शेळ्या-मेंढ्यांना पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील मेंढपाळांनी कृष्णा, वारणा नदीकाठाकडे स्थलांतर केले आहे.यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असतानाही पाणी टंचाईची तीव्रता एप्रिलमध्येच जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या ३१ पाणी टँकर सुरू असून मागणीही वाढतच आहे. खानापूर, जत, तासगाव या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या गावांमध्ये टँकरची मागणी वाढू लागली आहे. धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिना बाकी असताना, टँकरची मागणी वाढू लागल्यामुळे प्रशासनही चिंतेत आहे.लघु प्रकल्पांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)तालुकाप्रकल्प संख्याप्रकल्पाची क्षमतासध्याचा पाणीसाठाटक्केतासगाव७७०९.०६१०५.०८१५खानापूर९७१२.४२१८८.४८२६कडेगाव६७१४.६८३००.००४२शिराळा५३५९.०९२७३.३०३४आटपाडी१३१३६७.२८२६७.०७२०जत२८३७१५.२३२१८.९५६क़महांकाळ११९५५.९६६८.७९७मिरज३१४१.८६४४.६५३१वाळवा२५१.८४८.३३१६एकूण८४९४३९.९६१५६०.४४१७