शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: April 5, 2016 23:36 IST

दुष्काळाची दाहकता वाढली : तहानलेल्या १०४ गावांना टँकरचा आधार, उद्भवांचा शोध सुरूच...

अशोक डोंबाळे -- सांगली --जिल्ह्यातील १०४ गावे आणि ८२० वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ६० हजार ८०६ लोकसंख्येला १२२ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. तलाव, विहिरी, विंधन विहिरींचा आधार घेऊन टँकर भरले जात आहेत. परंतु, जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठी शिल्लक असल्याची पाटबंधारे विभागाची माहिती आहे. तीसहून अधिक तलाव कोरडे पडले असून, तहानलेल्या गावांसाठी प्रशासनाकडून पाणी उद्भवाचा शोधाशोध सुरु आहे. टेंभू, आरफळ, ताकारी अािण म्हैसाळ योजनांमधून काहीप्रमाणात पाणी सोडल्यामुळे दुष्काळी तालुक्यातील टंचाईची झळ काहीप्रमाणात कमी झाली आहे.जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाझर तलाव फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात ८३ पाझर तलाव असून, यामध्ये नऊ हजार ४३८.८६ दशलक्ष घनफूट साठ्याची क्षमता आहे. यापैकी सध्या तीसहून अधिक तलाव कोरडे पडले आहेत. उर्वरित तलावांमध्ये एक हजार २६८.५४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. १३ टक्केच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. एवढ्या पाण्यावर लाखो लोकसंख्येचा आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि आरफळ उपसा सिंचन योजनेतून कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, मिरज पूर्व भागातील तलावांमध्ये पाणी सोडल्यामुळे १३ टक्के पाणीसाठा दिसत आहे. जत तालुक्यातील मोजक्याच भागात म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचत असल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. तहानलेल्या गावांसाठी प्रशासनाकडून उद्भवांचा शोधाशोध सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. जत तालुक्यातील ५९ गावे आणि ५३३ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ७५ हजार ८५७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून, भविष्यात टँकर वाढण्याचीच शक्यता आहे. जत तालुक्यानंतर तासगाव तालुक्यात सर्वाधिक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. बावीस गावे १७० वाड्या-वस्त्यांमधील तीस हजार ८०४ लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा होत आहे. खानापूर तालुक्यातील दहा गावे आणि ४१ वाड्या-वस्त्यांमधील जनतेची तहान बारा टँकरद्वारे भागविली जात आहे. उन्हाळी पाऊस झाला नाही तर भविष्यात दुष्काळी तालुक्यांतील परिस्थिती आणखी कठीण होणार आहे. टेंभू योजनेमुळे आटपाडी तालुक्यात प्रथमच दुष्काळाची झळ कमी झाली आहे. आटपाडी तालुक्यातील केवळ चार गावे आणि १६ वाड्या-वस्त्यांवर तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात सहा गावे, ५७ वाड्या-वस्त्यांवर नऊ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. कडेगाव तालुक्यातील ढानेवाडी या एकमेव गावाला टँकर सुरु आहे. कृष्णा आणि वारणा नदी वाळवा आणि शिराळा तालुक्यातून वाहत असतानाही शिराळा तालुक्यात एक गाव आणि दोन वाड्यांना, तर वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर गावाला टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. चाऱ्याचा प्रश्न : पाण्याची चिंता वाढली...पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व भागातील खरीप व रबी हंगामातील पिके वाया गेली आहेत. यामुळे येथील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांचा पशुधन जगविण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरु आहे. चाऱ्यापेक्षाही शेळ्या-मेंढ्या आणि अन्य मोठ्या पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. दुष्काळी भागामध्ये पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न शासनाने तातडीने सोडविण्याची मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.एप्रिल ते जून महिन्याचा ३३ कोटींचा टंचाई आराखडा तयारएप्रिल ते जून २०१६ या तीन महिन्यांचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ३३४ गावे आणि एक हजार २०३ वाड्या-वस्त्यांना टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये टंचाई उपाययोजना करण्यासाठी नवीन विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, २८० नव्याने टँकर सुरु करावे लागणार असून, त्यासाठी ३३ कोटी ६४ लाख ८६ हजारांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली.