शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

कांदा प्रतिक्विंटल तीन हजारांवर

By admin | Updated: July 27, 2015 00:35 IST

पावसाअभावी दरात दुपटीने वाढ : फळभाज्या स्वस्त, पालेभाज्यांचे दर स्थिर

सांगली : पावसाने ओढ दिल्याने नव्या पिकाला फटका बसल्याचे कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. दीड हजारावरून घाऊक कांद्याचा दर तीन हजार रुपये क्विंटल झाला आहे. किरकोळ बाजारातील विक्री २८ ते ३५ रुपये किलो झाली आहे. फळभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. सांगलीमध्ये सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून कांद्याची आवक होत असते. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याची आवक मंदावली आहे. नव्या पिकाला पावसामुळे फटका बसल्याने आवक कमी झाली आहे. यामुळे आठ दिवसांपूर्वी दीड हजार रुपये क्विंटल असणारा कांदा आता अडीच हजार ते तीन हजार रुपये क्विंटल झाला आहे. किरकोळ बाजारातही कांदा २८ ते ३५ रुपये किलो झाला आहे. यामुळे गृहिणींच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. इतर फळभाज्यांचे दर या सप्ताहात उतरले आहेत. वांगी २० ते २५ रुपये किलो असून, दोडका ३५ ते ४० किलो आहे. काकडी, गाजराचे दरही उतरले आहेत. वाटाण्याचा दर वाढून आता शंभर रुपये किलो झाला आहे. फळभाज्यांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे : टोमॅटो १८ ते २० रुपये, कोबी २५ ते ३०, फ्लॉवर ३५ ते ४०, कारली ३५ ते ४०, वांगी २० ते २५, भेंडी ३५ ते ४०, दुधी भोपळा ३० ते ४०, देशी गवारी ५५ ते ६०, गवारी ३५ ते ४०, दोडका ४० ते ४५, देशी काकडी ३५ ते ४०, तर पांढरी काकडी ३०, पडवळ ३५ ते ४०, कांदे २८ ते ३५, बटाटे १८ ते २०, लसूण ६० ते ७०, आले ९० ते शंभर रुपये याप्रमाणे दर आहेत.पालेभाज्यांचा दर स्थिर आहेत. मेथी ८ ते १० रुपये पेंडी असून, इतर भाज्यांचे दर असे आहेत. पालक ५ ते ७, तांदळ ७ ते ८, अंबाडा ५ ते ७, कांदा ८ ते १०, चाकवत ७ ते ८, शेपू ५ ते ७ रुपये. (प्रतिनिधी)आवक मंदावल्याचा फटकाव्यापाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली होती. परंतु संपूर्ण जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. सातारा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमधून सांगली जिल्ह्यात होणारी आवक मंदावल्याने दर वाढले आहेत.