शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जिल्ह्यातील २११ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST

सांगली : जिल्ह्यातील २११ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. कोरोना अजून संपलेला नाही. ...

सांगली : जिल्ह्यातील २११ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे गणेश मंडळाने शासनाच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४०४ मंडळांच्या बैठका घेतल्या. गुन्हे दाखल असणाऱ्या ६१२ जणांवर कारवाई करून ७९६ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मिरज-पंढरपूर रस्त्यावर तीन गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दुचाकीसह सायकलचोऱ्या टोळीचाही पर्दाफाश करण्यात आला. तसेच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. १९६ जणांवर कारवाई करण्यात आली.

ते म्हणाले की, शासनाने मंडपात दर्शनाबाबत निर्बंध घातले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मंडळांना स्थानिक प्रशासनाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच गणेशमूर्ती चार फुटांपर्यंत मर्यादित असावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत, यासाठी मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम आयोजित करून गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. वर्गणीच्या पैशांतून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. सीसीटीव्ही लावण्याच्या ठिकाणी, त्याचा दर्जा याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत होईल, असेही गेडाम म्हणाले.

चौकट

साडेतीन हजार पोलीस तैनात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यासाठी २५०० पोलीस, १२०० गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड), दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह २०० अधिकाऱ्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केल्याचे गेडाम यांनी सांगितले.