शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शंभर गावांत ‘एक गाव एक गणपती’

By admin | Updated: August 29, 2014 23:13 IST

जोर ओसरला : बक्षीस मिळाल्यानंतर संकल्पनेचा विसर

सचिन लाड -सांगली -पोलीस आणि प्रशासन राबवत असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेचा जोर गतवर्षीपासून ओसरला आहे. यावर्षी जिल्ह्यातील १०० गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या संकल्पनेचा विसर पडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गावातील सार्वजनिक गणेशोत्सवावरील खर्च कमी व्हावा, लोकवर्गणीचा विनियोग समाजहितासाठी व्हावा, गावातील तंटे कमी व्हावेत, मंडळांच्या कार्यकर्त्यांतील स्पर्धा संपावी, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना मांडण्यात आली. या विधायक उपक्रमात सहभागी होणाऱ्या गावांची संख्या सध्या वाढत आहे. जिल्ह्यात ७०५ गावे असून, २५ लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी असून, पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक गावे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहेत. एखादी घटना घडली, तर तिथे पोहोचण्यासाठी पोलिसांना किमान अर्धा तास लागतो. गणेशोत्सवात तर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना घडू शकते. गावपातळीवरील अनेक गावात गट-तट आहेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा असते. यातून मग वाद उफाळून संघर्ष व मारामारीचे प्रकार घडतात. यामुळे पोलिसांना चोवीस तास पहारा द्यावा लागतो.बारा वर्षापूर्वी जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांनी प्रत्येक गावातील सरपंच व गणेश मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सांगलीत बैठक घेतली. ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेची माहिती सांगून त्यानुसार गावात अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला या संकल्पनेला कमी प्रतिसाद मिळाला. परंतु पोलीस व प्रशासनाने हार मानली नाही. मंडळांच्या कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक आयोजित करुन त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बक्षिसानंतर गावे पडली प्रवाहातून बाहेरसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव स्वच्छ ठेवून राज्यात पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या गावास २५ लाखाचे बक्षीस दिले जाते. हे बक्षीस मिळविण्यासाठी गावा-गावात स्पर्धा असते. त्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेसही काही गुण आहेत. त्यानंतर सात वर्षापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाले. या अभियानात सहभागी झालेल्या गावांनी गावात तंटाच नको म्हणून ‘एक गाव एक गणपती’चा स्वीकार केला. मात्र या दोन्ही अभियानांच्या माध्यमातून बक्षीस मिळविल्यानंतर या गावांना संकल्पनेचा विसर पडला आहे.