शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

एक हजार संस्थांची चौकशी होणार

By admin | Updated: April 14, 2015 00:59 IST

चंद्रकांत पाटील : निवृत्त अधिकाऱ्यांच्या पॅनेलमार्फत चौकशी

सांगली : राज्यातील एक हजारांवर सहकारी संस्था, बाजार समित्यांच्या चौकशीची तयारी शासनाने केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी न करता निवृत्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पॅनेलमार्फत चौकशी केली जाणार आहे. सहकारी संस्था व बाजार समित्यांच्या निवडणुकानंतर चौकशीच्या प्रक्रियेस सुरुवात होईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, ज्यांच्या चौकशीची खऱ्या अर्थाने गरज आहे, अशा सुमारे एक हजार संस्था राज्यात आहेत. यामध्ये काही बाजार समित्याही आहेत. बाजार समित्यांच्या सेसच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशांचीही चौकशी झाली पाहिजे. निवडणुकांनंतर राज्यात या सर्वच संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले जातील. सरकारी अधिकाऱ्यांकडे चौकशी दिली, तर ती रेंगाळण्याची शक्यता असते. त्यामुळे निवृत्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या पॅनेलमार्फत चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. टोलसंदर्भात ते म्हणाले की, दोनशे कोटींपेक्षा अधिक खर्चाचे रस्ते प्रकल्प करणे सरकारला झेपणार नाही. त्यामुळे असे मोठे प्रकल्पच खासगी तत्त्वावर उभारले जातील. दोनशे कोटींपेक्षा कमी खर्चाचे प्रकल्प शासन करेल. सध्या सर्वच ठिकाणच्या टोल नाक्यांवर छोट्या वाहनांचा टोल माफ केला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे टोलबाबत निर्णय घेतले आहेत. (प्रतिनिधी) आता कारखान्यांवर कारवाई खरेदी कर माफ करणे, निर्यात साखरेवर अनुदान देणे, असे उपाय करतानाच शासनाने साखरेचे दर कमी झाले म्हणून दोन हजार कोटींचे पॅकेज साखर कारखान्यांना दिले आहे. इतके करूनही जर कारखान्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला नाही, तर कारखान्यांवर कारवाई केली जाईल. कोणालाही आता माफ केले जाणार नाही, असा इशारा सहकारमंत्री पाटील यांनी दिला. साखरेच्या दराबाबतही उपाय सुरू आहेत. ५0 लाख टनाचा बफर स्टॉक करण्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पॅनेलमध्ये शिरावे लागेल सहकारी संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला असला तरी, काही ठिकाणी आम्हाला अन्य पक्षांच्या पॅनेलशीही हातमिळवणी करावी लागेल. आमच्या कार्यकर्त्यांना संस्थांमध्ये जाऊन माहिती होणे गरजेचे आहे. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही अन्य पक्षांबरोबर जाऊ. रस्ते कामांच्या प्रश्नात बऱ्याचदा तुकडे पाडून कंत्राटे दिली जात आहेत. अशा मोठ्या कामांसाठी मोठ्या कंपन्यांची गरज असते. कंपन्या येत नसल्याने आम्हीच आता मोठ्या शहरात काम करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करणार आहोत, अशी माहितीही पाटील यांनी दिली.