शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आढळला राज्यातील सर्वांत जुना वीरगळ लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:02 IST

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे ९५० वर्षांपूर्वी युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूर योद्ध्याचे स्मारक आढळून आले आहे. महाराष्टÑातील हा ...

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे ९५० वर्षांपूर्वी युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूर योद्ध्याचे स्मारक आढळून आले आहे. महाराष्टÑातील हा सर्वांत जुना वीरगळ लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी याबाबत संशोधन केले आहे.चालुक्यराजा दुसरा सोमेश्वर याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील यो्द्ध्याला वीरमरण आले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ तयार करून त्याच्यावर लेख कोरून ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील हा पहिला लेखयुक्त वीरगळ असून, महाराष्टÑात आढळलेल्या वीरगळ लेखात तो सर्वात जुना असल्याचेही समोर आले आहे. या संशोधनाने जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात भर पडली आहे. प्राचीन काळात एखादा वीर पुरुष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशीळा उभ्या करतात. त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. ते वैविध्यपूर्ण आकारात शिल्पांकित केलेले असतात. त्यावर खालच्या टप्प्यात संबंधित वीर पुरूषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते. अगदी वरील भागात हा वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखविलेला असतो.वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी आढळतात. मात्र, ज्या योध्द्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत, त्याचे नाव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते. महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मिळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. काटकर आणि कुमठेकर अनेक वर्षे वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. अभ्यास करीत असताना त्यांना कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापैकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला. हा लेखयुक्त वीरगळ सुमारे पाच फूट उंचीचा आहे. खालील भागात एक वीर ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई करताना दाखविला आहे. वरील कलशाकृती भागावर आणि मधील टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे.प्राचीन इतिहासात मोठी भरवीरगळ अभ्यासासाठी बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), सरपंच व्यंकटराव पाटील, तुकाराम गुरव, सागर शेटे आणि नबीलाल तांबोळी यांचे सहकार्य लाभले. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक या वीरगळावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच यासंदर्भातील संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहेत. या लेखाच्या संशोधनाने सांगली जिल्'ाच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.काय आहे लेखात...वीरगळावरील लेखात ‘चालुक्यनृपती दुसरा सोमेश्वर ऊर्फ भुवनेकमल्ल’ याच्या कारकिर्दीत आगळगावच्या एका वीराची मोठ्या समूहाशी लढाई झाल्याचे आणि त्यात तो धारातीर्थी पडल्याचे म्हटले आहे. लेख अस्पष्ट असल्यामुळे या वीराचे नाव समजू शकत नाही. गावकुसाच्या तटावरून ही लढाई झाली. चालुक्यनृपती दुसरा सोमेश्वर ऊर्फ भुवनेकमल्ल याची कारकीर्द १०६८ ते १०७६ अशी अवघी आठ वर्षांची होती. त्याचा हा काळ अत्यंत धामधुमीचा होता. वेगवेगळ्या राजवटींबरोबर सातत्याने या काळात युद्धे झाल्याच्या नोंदी आहेत. शिवाय सोमेश्वर याचा धाकटा भाऊ विक्रमादित्य यानेही सोमेश्वराविरोधात बंडखोरी केली होती. तोही सोमेश्वर याच्या ताब्यात असणाऱ्या मुलखांवर स्वाºया करीत असे.