शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत लढा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:24 IST

वाळवा : पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गेली ३७ वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन होत ...

वाळवा : पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गेली ३७ वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असे प्रतिपादन हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी केले.

कोडोली (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. संघटनेचे राज्यसरचिटणीस लक्ष्मण पासलकर, भारत पाटील, मुसा मुल्ला, उमेश कानडे, श्रीपती पाटील, राजाराम पाटील, सुरेश जाधव, दीपक सोनवणे प्रमुख उपस्थित होते.

नायकवडी म्हणाले, जवळपास राज्यातील सहा लाख धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. हे शंभर टक्के प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.

लक्ष्मण पासलकर म्हणाले, क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णांच्या विचाराने हा लढा नेटाने पुढे नेला पाहिजे. डाॅ. जे. टी. पाटील यांनी स्वागत आणि ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे यांनी प्रास्ताविक केले. एम. पी. पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांतून धरणग्रस्त महिला व पुरुष तसेच युवक उपस्थित होते.

फोटो-११वाळवा१

फोटो ओळ : कोडोली (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या जाहीर मेळाव्यात महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.