शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत लढा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:24 IST

वाळवा : पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गेली ३७ वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन होत ...

वाळवा : पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गेली ३७ वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असे प्रतिपादन हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी केले.

कोडोली (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. संघटनेचे राज्यसरचिटणीस लक्ष्मण पासलकर, भारत पाटील, मुसा मुल्ला, उमेश कानडे, श्रीपती पाटील, राजाराम पाटील, सुरेश जाधव, दीपक सोनवणे प्रमुख उपस्थित होते.

नायकवडी म्हणाले, जवळपास राज्यातील सहा लाख धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. हे शंभर टक्के प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.

लक्ष्मण पासलकर म्हणाले, क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णांच्या विचाराने हा लढा नेटाने पुढे नेला पाहिजे. डाॅ. जे. टी. पाटील यांनी स्वागत आणि ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे यांनी प्रास्ताविक केले. एम. पी. पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांतून धरणग्रस्त महिला व पुरुष तसेच युवक उपस्थित होते.

फोटो-११वाळवा१

फोटो ओळ : कोडोली (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या जाहीर मेळाव्यात महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.