शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत लढा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:24 IST

वाळवा : पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गेली ३७ वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन होत ...

वाळवा : पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे गेली ३७ वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असे प्रतिपादन हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी केले.

कोडोली (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. संघटनेचे राज्यसरचिटणीस लक्ष्मण पासलकर, भारत पाटील, मुसा मुल्ला, उमेश कानडे, श्रीपती पाटील, राजाराम पाटील, सुरेश जाधव, दीपक सोनवणे प्रमुख उपस्थित होते.

नायकवडी म्हणाले, जवळपास राज्यातील सहा लाख धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. हे शंभर टक्के प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.

लक्ष्मण पासलकर म्हणाले, क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णांच्या विचाराने हा लढा नेटाने पुढे नेला पाहिजे. डाॅ. जे. टी. पाटील यांनी स्वागत आणि ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे यांनी प्रास्ताविक केले. एम. पी. पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांतून धरणग्रस्त महिला व पुरुष तसेच युवक उपस्थित होते.

फोटो-११वाळवा१

फोटो ओळ : कोडोली (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या जाहीर मेळाव्यात महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.