शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

साखर कारखान्यांकडून शंभर टक्के ऊसदर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, क्रांती व अन्य कारखान्यांनी जाहीर केलेले दर आम्हाला मान्य नाहीत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून डॉ. सी. रंगराजन् ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, क्रांती व अन्य कारखान्यांनी जाहीर केलेले दर आम्हाला मान्य नाहीत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून डॉ. सी. रंगराजन् समितीच्या ७0-३0 च्या फॉर्म्युल्याच्या अंमलबजावणीची मागणी केली जात आहे. आम्हाला रंगराजन् समितीपेक्षा गणदेवी कारखान्याच्या शंभर टक्के दराचा फॉर्म्युला अधिक न्यायकारक वाटतो. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी या फॉर्म्युल्याचा स्वीकार केला पाहिजे. गणदेवी कारखान्याचा उतारा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांपेक्षा कमी असूनही, गणदेवी कारखान्याकडून सर्वाधिक दर दिला जातो. गाळपाच्या माध्यमातून मिळालेले सर्व उत्पन्न ते ऊस शेतकºयांना दराच्या रुपाने देतात आणि उपपदार्थ निर्मितीमधून कारखान्याचा सर्व खर्च अदा करतात. त्यामुळे ही पद्धत सर्वत्र स्वीकारण्याची गरज आहे. अग्रीम बिलापेक्षा अंतिम बिलाला महत्त्व आहे.ते म्हणाले की, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्यासारखे नेते पहिल्या बिलाचाच गाजावाजा करतात. अंतिम बिलाचे काय होते, त्याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे कारखान्यांशी त्यांचे साटेलोटे आहे. शेट्टी यांनी आजवर जाहीर केलेला दर कारखान्यांनी दिलेला नाही. तरीही ते गप्प बसतात. पहिल्या उचलीच्या आकड्यात शेतकºयांना गुंतवायचे, असे या शेतकरी नेत्यांचे कारखानाधार्जिणे धोरण आहे. जागतिक बाजारातील पेट्रोल, डिझेल दराचा साखर उत्पादनावर परिणाम होतो. सध्या क्रुड आॅईलचे दर कमी असल्यामुळे साखर उत्पादन वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.