शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

साखर कारखान्यांकडून शंभर टक्के ऊसदर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, क्रांती व अन्य कारखान्यांनी जाहीर केलेले दर आम्हाला मान्य नाहीत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून डॉ. सी. रंगराजन् ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, क्रांती व अन्य कारखान्यांनी जाहीर केलेले दर आम्हाला मान्य नाहीत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून डॉ. सी. रंगराजन् समितीच्या ७0-३0 च्या फॉर्म्युल्याच्या अंमलबजावणीची मागणी केली जात आहे. आम्हाला रंगराजन् समितीपेक्षा गणदेवी कारखान्याच्या शंभर टक्के दराचा फॉर्म्युला अधिक न्यायकारक वाटतो. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी या फॉर्म्युल्याचा स्वीकार केला पाहिजे. गणदेवी कारखान्याचा उतारा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांपेक्षा कमी असूनही, गणदेवी कारखान्याकडून सर्वाधिक दर दिला जातो. गाळपाच्या माध्यमातून मिळालेले सर्व उत्पन्न ते ऊस शेतकºयांना दराच्या रुपाने देतात आणि उपपदार्थ निर्मितीमधून कारखान्याचा सर्व खर्च अदा करतात. त्यामुळे ही पद्धत सर्वत्र स्वीकारण्याची गरज आहे. अग्रीम बिलापेक्षा अंतिम बिलाला महत्त्व आहे.ते म्हणाले की, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्यासारखे नेते पहिल्या बिलाचाच गाजावाजा करतात. अंतिम बिलाचे काय होते, त्याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे कारखान्यांशी त्यांचे साटेलोटे आहे. शेट्टी यांनी आजवर जाहीर केलेला दर कारखान्यांनी दिलेला नाही. तरीही ते गप्प बसतात. पहिल्या उचलीच्या आकड्यात शेतकºयांना गुंतवायचे, असे या शेतकरी नेत्यांचे कारखानाधार्जिणे धोरण आहे. जागतिक बाजारातील पेट्रोल, डिझेल दराचा साखर उत्पादनावर परिणाम होतो. सध्या क्रुड आॅईलचे दर कमी असल्यामुळे साखर उत्पादन वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.