शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत यशवंत बँकेकडून शंभर टक्के ठेवी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST

यशवंत सहकारी बँकेच्या एक लाखावरील ठेवीदारांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नीळकंठ करे यांनी ठेव रकमेचे धनादेश दिले. २००५ ...

यशवंत सहकारी बँकेच्या एक लाखावरील ठेवीदारांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नीळकंठ करे यांनी ठेव रकमेचे धनादेश दिले. २००५ नंतर सांगली जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका अडचणीत आल्या. लाखो ठेवीदारांच्या ठेवी या बॅंकांत अडकल्या आहेत. मिरजेतील १४ कोटींच्या ठेवी असणारी यशवंत सहकारी बँक आर्थिक अडचणीत आल्याने २००९ मध्ये या बँकेवर अवसायक मंडळ नेमण्यात आले. या अवसायक मंडळाने एक लाखापर्यंतच्या विमा असलेल्या सुमारे १० कोटींच्या ठेवी ठेवीदारांना परत दिल्या आहेत. थकित कर्जवसुली करून विमा कंपनीचे दहा कोटी परत करण्यात आले; मात्र एक लाखावरील ठेवीदारांच्या सुमारे चार कोटींच्या ठेवी अडकून पडल्या होत्या.

अवसायकांनी बॅंकेची इमारत विक्री करून इतर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी १५ ठेवीदारांना ठेव रकमेचे धनादेश जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्याहस्ते देण्यात आले. अवसायनात निघालेल्या यशवंत बँकेतील शंभर टक्के ठेवी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शंभर टक्के ठेवी परत करणारी यशवंत बँक ही जिल्ह्यातील दुसरी बँक ठरली आहे. ठेवीदारांनी आपल्या ठेव रकमेसाठी बँकेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी केले आहे. यावेळी अवसायक व सहायक उपनिबंधक सुनील चव्हाण, अवसायक अनिल पैलवान, बँकेचे व्यवस्थापक युनूस शेख यांच्यासह कर्मचारी व ठेवीदार उपस्थित होते.