शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडून ‘ताकारी’ची एक कोटीची पाणीपट्टी थकित

By admin | Updated: November 7, 2014 23:36 IST

वीज पुरवठा खंडित : रब्बी हंगामाबाबत साशंकता; शेतकरी चिंतेत

दिलीप मोहिते - विटा -साखर कारखान्यांनी २०१३-१४ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेली ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची रक्कम कृष्णा खोरेकडे वर्ग केली नाही. पाणीपट्टीची थकित रक्कम सुमारे एक कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील ऊस गाळपासाठी सोनहिरा, केन अ‍ॅग्रो, क्रांती, उदगिरी कारखान्यांकडे पाठविला जातो. साखर कारखान्यांकडून ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची आकारून आलेली रक्कम कपात करून ती पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली जाते. कपात केलेली पाणीपट्टीची रक्कम काही कारखान्यांकडे अजूनही पडून आहे. ही रक्कम सुमारे १ कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय डोईफोडे यांनी केला आहे. वसुली सदोष पाणीपट्टी वसुलीची यादी पाटबंधारे विभागाकडून सोनहिरा, क्रांती, केन अ‍ॅग्रो व उदगिरी साखर कारखान्यांकडे पाठविली जाते. ही यादी एकच असते. परंतु, शेतकऱ्यांचा ऊस यातील दोन-तीन कारखान्यांना गळितासाठी पाठविला जातो. मात्र, हे सर्वच कारखाने पाणीपट्टीची कपात करतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकाच क्षेत्राची दोन-दोनवेळा पाणीपट्टी कपात होते. पाणीपट्टी देणारपाटबंधारे विभागाच्या मागणीप्रमाणे त्यांना पाणीपट्टीची रक्कम दिली जाते : मोहनराव कदमवीज पुरवठा खंडित होण्याची प्रतीक्षा पाटबंधारे विभागाने का केली? वीज बिलासाठी रक्कम पाहिजे असल्यास मागणी केली तर आम्ही ती देऊ : अरुण लाडकालव्यांच्या कामांची रक्कम सुमारे तीन कोटी पाटबंधारे विभागाकडून मिळाली नाही : जयकर पाटील