प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, जिल्ह्यात दि. १५ सप्टेंबर या दिवशी दीड लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेन ठेवले आहे. यासाठी जिल्ह्यात ३०० लसीकरण केंद्रे असणार आहेत. लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची ऑनलाईन माहिती भरण्यासह त्यांना लस देण्यापर्यंतचे नियोजन जिल्हा परिषदेन केले आहे. या माेहिमेमध्ये सर्व शिक्षक, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत. दीड लाख व्यक्तींना लस देण्याचे उद्दिष्ट असले, तरी त्यादिवशी दोन लाख लस उपलब्ध केल्या आहे.
चौकट
लसीकरणाचे असे आहे नियोजन
-जिल्ह्यात ३०० लसीकरण केंद्र
-वैद्यकीय अधिकारी : १५०
-??????सुदायक आरोग्य अधिकारी : २९०
-आरोग्य सेविका : ३५०
-ग्रामपंचायत, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षकांचाही सहभाग
चौकट
कोरोनात बचावासाठी लस गरजेची : जितेंद्र डुडी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने महाराष्ट्रातील काही शहरांत शिरकाव केला आहे. तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घेण्याची गरज आहे. नागरिकांना लसीची व्यवस्था जवळ व्हावी, म्हणून बुधवार, दि. १५ रोजी विशेष मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त लस घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.