शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पाणी योजनेवरून जुने पदाधिकारी धारेवर

By admin | Updated: November 27, 2015 00:01 IST

भिलवडी ग्रामसभा : रखडलेल्या पाणी योजनेचा लेखाजोखा देण्याची मागणी

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायतीच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच ग्रामसभेत दोन कोटी रूपये खर्चाच्या पिण्याच्या पाणी योजनेचे काम अपुरे ठेवल्याबद्दल व ते रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध नसल्याच्या कारणावरून ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांसह माजी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांनी, सभा सुरू असताना ग्रामविकास अधिकारी पवार हे विसंगत उत्तरे देत असताना माजी सरपंच राहुल कांबळे यांना बोलावण्यात आले. दोन कोटीची पाणी योजना अपुरी ठेवल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे, या योजनेचा लेखाजोखा तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली.या बैठकीवेळी राहुल कांबळे यांनी, आपण सर्व लेखाजोखा चार डिसेंबरच्या विशेष ग्रामसभेत देतो असे जाहीर केले. ही योजना राबविताना बऱ्याच अडचणी आल्या असून काही पदाधिकारी, सदस्य, ठेकेदार व अधिकारी वर्गाकडून वेळेत सहकार्य न मिळाल्याने ही योजना पूर्ण करण्यास विलंब झाला असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांनी, पदाधिकारी हे गावाचे सेवक असून सर्वसमावेशक विकास कामे पूर्ण करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. सदस्य धनंजय पाटील यांनी, एकूण महसुलाच्या १५ टक्के निधी हा भिलवडीतील दलित वस्तीच्या विकासासाठी खर्च केला जाणार असल्याचे सांगितले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी, बाजार मैदानात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी केली. तंटामुक्त अभियान समिती, आरोग्य समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती या सर्व समित्या बरखास्त करणे, कृष्णा नदीपात्रामध्ये वाळू उपसा बंदी, गावकामगार तलाठ्यांची बदली करणे, गंजीखान्यातील प्लॉटला नगररचना खात्याकडून बांधकाम परवाना मिळविणे, उसाला एफ. आर. पी. प्रमाणे एकरकमी बिल देण्याच्या मागणीच्या ठरावाबरोबरच विविध ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. प्रारंभी सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच मन्सूर मुल्ला, महावीर चौगुले, सतीश चौगुले, श्रीकांत निकम, तानाजी भोई, विजय पाटील, गिरीश वाळवेकर, चंद्रकांत केंगार आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)४ डिसेंबरला लेखाजोखा : अनेकांकडून असहकार्य राहुल कांबळे यांनी, आपण सर्व लेखाजोखा चार डिसेंबरच्या विशेष ग्रामसभेत देतो असे जाहीर केले. ही योजना राबविताना बऱ्याच अडचणी आल्या असून काही पदाधिकारी, सदस्य, ठेकेदार व अधिकारी वर्गाकडून वेळेत सहकार्य न मिळाल्याने ही योजना पूर्ण करण्यास विलंब झाला असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.