शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पाणी योजनेवरून जुने पदाधिकारी धारेवर

By admin | Updated: November 27, 2015 00:01 IST

भिलवडी ग्रामसभा : रखडलेल्या पाणी योजनेचा लेखाजोखा देण्याची मागणी

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायतीच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच ग्रामसभेत दोन कोटी रूपये खर्चाच्या पिण्याच्या पाणी योजनेचे काम अपुरे ठेवल्याबद्दल व ते रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध नसल्याच्या कारणावरून ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांसह माजी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांनी, सभा सुरू असताना ग्रामविकास अधिकारी पवार हे विसंगत उत्तरे देत असताना माजी सरपंच राहुल कांबळे यांना बोलावण्यात आले. दोन कोटीची पाणी योजना अपुरी ठेवल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे, या योजनेचा लेखाजोखा तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली.या बैठकीवेळी राहुल कांबळे यांनी, आपण सर्व लेखाजोखा चार डिसेंबरच्या विशेष ग्रामसभेत देतो असे जाहीर केले. ही योजना राबविताना बऱ्याच अडचणी आल्या असून काही पदाधिकारी, सदस्य, ठेकेदार व अधिकारी वर्गाकडून वेळेत सहकार्य न मिळाल्याने ही योजना पूर्ण करण्यास विलंब झाला असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांनी, पदाधिकारी हे गावाचे सेवक असून सर्वसमावेशक विकास कामे पूर्ण करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. सदस्य धनंजय पाटील यांनी, एकूण महसुलाच्या १५ टक्के निधी हा भिलवडीतील दलित वस्तीच्या विकासासाठी खर्च केला जाणार असल्याचे सांगितले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी, बाजार मैदानात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी केली. तंटामुक्त अभियान समिती, आरोग्य समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती या सर्व समित्या बरखास्त करणे, कृष्णा नदीपात्रामध्ये वाळू उपसा बंदी, गावकामगार तलाठ्यांची बदली करणे, गंजीखान्यातील प्लॉटला नगररचना खात्याकडून बांधकाम परवाना मिळविणे, उसाला एफ. आर. पी. प्रमाणे एकरकमी बिल देण्याच्या मागणीच्या ठरावाबरोबरच विविध ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. प्रारंभी सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच मन्सूर मुल्ला, महावीर चौगुले, सतीश चौगुले, श्रीकांत निकम, तानाजी भोई, विजय पाटील, गिरीश वाळवेकर, चंद्रकांत केंगार आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)४ डिसेंबरला लेखाजोखा : अनेकांकडून असहकार्य राहुल कांबळे यांनी, आपण सर्व लेखाजोखा चार डिसेंबरच्या विशेष ग्रामसभेत देतो असे जाहीर केले. ही योजना राबविताना बऱ्याच अडचणी आल्या असून काही पदाधिकारी, सदस्य, ठेकेदार व अधिकारी वर्गाकडून वेळेत सहकार्य न मिळाल्याने ही योजना पूर्ण करण्यास विलंब झाला असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.