शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा लवकरच बदलून देऊ

By admin | Updated: May 25, 2017 23:22 IST

जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा लवकरच बदलून देऊ

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : राज्यात कर्जमाफीसाठी विरोधक आग्रही असले तरी, मागच्यावेळी झालेली कर्जमाफी निव्वळ धनदांडग्यांना मिळाली होती. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी मुख्यमंत्री डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय होईल, असे मत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या खात्यातील पैशाची चौकशी पूर्ण झाली असून, लवकरच त्या जुना नोटा बदलून मिळतील, असेही ते म्हणालेसावळज (ता. तासगाव) येथे झालेल्या शेतकरी संवाद यात्रेप्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंंह देशमुख उपस्थित होते.पालकमंत्री देशमुख म्हणाले की, कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल; कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीच्या काळात राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये जमा झालेल्या जुन्या नोटा बऱ्याच महिन्यांपासून जिल्हा बँकांकडे तशाच पडून आहेत. जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या खात्यातील पैशाची चौकशी पूर्ण झाली असून त्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाशी चर्चा झाली आहे. लवकरच त्या जुना नोटा बदलून मिळतील. शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. पीककर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही. गरज भासल्यास शिखर बँकेकडून कर्जपुरवठा केला जाईल. पाटील म्हणाले, सावळजसह आठ गावात पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेतून पाणी देण्याचे नियोजन आहे. या कामाची निविदा निघाली असून कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच टेंभूचे पाणी सावळजच्या शिवारात येईल.यावेळी जलयुक्त शिवार योजनेतून अग्रणी नदी पुनरुज्जीवनाच्या कामाला पालकमंत्री देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली.शिवार संवाद यात्रेकडे शेतकऱ्यांची पाठराज्यातील विरोधकांच्या संघर्ष यात्रेनंतर सत्ताधारी भाजपने राज्यात शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. तासगाव तालुक्यातील सावळज येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवार संवाद यात्रेकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सांगली जिल्ह्यातील खासदारांसह भाजपची नेतेमंडळी उपस्थित असलेल्या या संवाद यात्रेत शेतकऱ्यांशी संवाद झालाच नाही.