शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पाणीप्रश्नावरून अधिकाºयांत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शंभरफुटी हनुमाननगरसह उपनगरांमधील पाणीटंचाईवरून गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत जोरदार खडाजंगी झाली. टंचाईचे कारण देताना पाणीपुरवठा अधिकारी शीतल उपाध्ये आणि शरद सागरे या दोन्ही अधिकाºयांमध्ये आयुक्तांसमोरच वादावादी झाली. आयुक्तांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत, दोन्ही अधिकाºयांना कार्यमुक्त का करू नये, अशा नोटिसा बजावण्याचे आदेश कामगार अधिकाºयांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शंभरफुटी हनुमाननगरसह उपनगरांमधील पाणीटंचाईवरून गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत जोरदार खडाजंगी झाली. टंचाईचे कारण देताना पाणीपुरवठा अधिकारी शीतल उपाध्ये आणि शरद सागरे या दोन्ही अधिकाºयांमध्ये आयुक्तांसमोरच वादावादी झाली. आयुक्तांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत, दोन्ही अधिकाºयांना कार्यमुक्त का करू नये, अशा नोटिसा बजावण्याचे आदेश कामगार अधिकाºयांना दिले.सभापती संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. आयुक्त सुरुवातीला उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीवरून संताप व्यक्त करीत सदस्य राजू गवळी यांनी अर्धा तास सभा रोखली. आयुक्त आल्यानंंतर पुन्हा सभा सुरू झाली. त्यानंतर शंभरफुटी व त्याठिकाणच्या उपनगरांमधील पाणीटंचाईबाबत दिलीप पाटील व गवळी यांनी प्रश्न उपस्थित केला.ते म्हणाले की, हनुमाननगर, रामकृष्ण सोसायटी, आप्पासाहेब पाटीलनगर, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनारायण कॉलनी, आदी परिसरात ऐन पावसाळ्यातही पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. मागील स्थायी समिती सभेत याबाबत आयुक्तांशी विचारणा केल्यानंतर, तत्काळ पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. तेव्हा दोन दिवस कसेबसे पाणी आले; परंतु पुन्हा आठवड्याभरात ११0 टँकर देण्यात आले. परिसरातील सुमारे २५ नागरिक याबाबत जाब विचारण्यासाठी सभेच्या ठिकाणी आले होते. त्यांना कसेबसे थांबविण्यात आले. सभापतींच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते, उपयोग काय? हा प्रश्न मिटल्याशिवाय सभा चालू देणार नाही.त्यानंतर यासंदर्भात खुलासा करताना उपाध्ये व सागरे या दोन्ही पाणीपुरवठा अधिकाºयांमध्ये जुंपली. उपाध्ये यांनी, माळबंगला येथील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असल्याचे सांगितले. शिवाय आपल्या प्रभागात १६0 मीटर पाण्याची पाईपलाईन टाकल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही, असेही सांगितले. मात्र, सागरे यांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीही संबंध नाही असे सांगत, उपाध्ये खोटे सांगून दिशाभूल करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे आयुक्तांनाही या घटनेचे आश्चर्य वाटले. त्यांनी लगेचच कामगार अधिकारी चंद्रकांत आडके यांना बोलावून दोघांनाही नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. त्यामुळे स्थायी सभेत अधिकाºयांमध्ये काही काळ तणाव दिसत होता.अधिकाºयांना लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पगार मिळतो की, भांडणासाठी, असा जाब आयुक्तांनी विचारला. यावेळी गवळी म्हणाले, अधिकाºयांचे काहीही करा; पण पाणीप्रश्न संपणार कधी? याचा खुलासा करा. खेबूडकर यांनी यासंदर्भात सायंकाळी तातडीची पाणीपुरवठा बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये तोडगा निघेल, असे स्पष्ट केले.डॉ. कवठेकर, आंबोळे यांना पुन्हा नोटिसासमडोळी रस्त्यावरील कचरा डेपोत कत्तलखान्याचा कचरा टाकणारी गाडी पकडली होती. त्या गाडीमालकावर फौजदारी दाखल करण्याबाबत यापूर्वीही सभेत आदेश झाले; पण महिना उलटून गेल्यानंतरही कारवाई न केल्याबद्दल सभेत पुन्हा जाब विचारला. त्यामुळे सभेतून बाहेर पडत डॉ. संजय कवठेकर व डॉ. आंबोळे यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगून, कारवाईस दिरंगाईबद्दल पुन्हा डॉ. कवठेकर आणि डॉ. आंबोळे यांना निलंबनाबाबत नोटिसा देण्यात आल्या, असे दिलीप पाटील यांनी सांगितले.