शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘लाचलुचपत’चा अधिकाऱ्यांनी घेतला धसका

By admin | Updated: December 12, 2014 23:36 IST

जतमधील स्थिती : कर्मचारीही धास्तावले; नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन महिन्यात तिघांवर कारवाई

जयवंत आदाटे - जत -सांगली लाचलुचपत विभागाने मागील तीन महिन्यात जत तालुक्यातील तीन जणांवर कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या घटनांमुळे येथील सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा धसका घेतला आहे. त्यामुळे टेबलाखालील सर्वच आर्थिक व्यवहार आता सावधानता बाळगून होऊ लागले आहेत.जत तालुक्यातील नागरिकांत अन्यायाच्या विरोधात उठाव करण्याची मानसिकता निर्माण होत आहे. सोशल मीडियाचा प्रभाव त्यांच्या मनावर होत आहे. प्रशासकीय कार्यालयात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून नियमानुसार काम होत नसेल, तर त्याचा जाब नागरिक आता संबंधितांना विचारू लागले आहेत. जत तालुक्यातील नागरिक मवाळ धोरणाचे आहेत. त्यांची पिळवणूक करून कितीही आर्थिक शोषण केले तरी, ते काही बोलत नाहीत, अशी मानसिकता तालुक्यात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांची यापूर्वी होती. परंतु त्यात आता बदल जाणवू लागला आहे.जत शहर वीज वितरण कार्यालयातील शाखा अभियंता अमीर शेख यांनी एकाच गावातील शेती विद्युत मीटरचे वीज कनेक्शन जत शहरातील नातेवाईकास बदलून देण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. संबंधितांनी त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर २२ आॅगस्ट २०१४ रोजी वीज वितरण कार्यालयात त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे. जत पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सीमा आघाव व त्यांचे पती दत्तात्रय बढे यांनी बिळूर (ता. जत) येथील एका परस्परविरोधी तक्रार असलेल्या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी संबंधिताकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी चार हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा आघाव यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई ७ नोव्हेंबर १४ रोजी केली आहे.जत भूमिअभिलेख कार्यालयातील उमेदवार सुरेश साळुंखे यांनी नियमानुसार वारसा नोंद करण्यासाठी दहा हजार रुपये संबंधितांकडे मागितले होते. त्यापैकी आठ हजार रुपये स्वीकारताना या कार्यालयातच २७ नोव्हेंबर रोजी त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील साळुंखे हा एक छोटा मासा होता. या प्रकरणातील मोठे मासे मात्र नामानिराळे आहेत. साळुंखे हे अधिकृतरित्या शासकीय सेवेत नाहीत. परंतु ते कोणासाठी काम करत होते आणि त्यांनी कोणासाठी पैशाची मागणी केली होती, याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न होणार असली तरी, जनतेसमोर त्यांची नावे उघड होणे आवश्यक आहे. बदली रद्द करण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहारजिल्हा प्रशासनाकडून एखादा अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला शिक्षा देण्यासाठी त्याची जत तालुक्यात यापूर्वी बदली करण्यात येत होती. त्यानंतर येथे आलेले कर्मचारी व अधिकारी परत तालुका सोडण्यास तयार होईनासे झाले. इतरत्र झालेली बदली रद्द करण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये खर्च होऊ लागले. यामागील गौडबंगाल काय आहे, हे लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात मागील पंधरा-वीस वर्षात काम करून इतरत्र बदली होऊन गेलेल्या अधिकाऱ्यांची व त्यांच्या नातेवाईकांची पूर्वीची आणि आताची मालमत्ता यातील तफावत किती आहे, याची चौकशी झाल्यास त्यांचे पितळ उघडे पडणार आहे.