शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पदाधिकाऱ्यांचे राजीनामा नाट्य रंगणार

By admin | Updated: January 5, 2016 00:55 IST

जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे ‘नॉट रिचेबल’ : पदाधिकारी बदलाची प्रक्रिया रखडणार

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षांसह चार सभापतींना राजीनामा देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी देऊनही, उपाध्यक्षांसह दोघे सभापती वगळता इतरांनी राजीनामा देण्यास चालढकल सुरू केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील यांनी राजीनाम्यास नकार दिल्याने, त्यांचे पती तानाजी पाटील यांची नेत्यांकडून मनधरणी सुरू आहे. तसेच सभापती उज्ज्वला लांडगे यांनीही सोमवारी राजीनामा सादर केला नसल्याने, पदाधिकारी बदलाची प्रक्रिया रखडणार आहे. दरम्यान, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, महिला व बालकल्याण सभापती पपाली कचरे यांनी शनिवारीच अध्यक्षा होर्तीकर यांच्याकडे राजीनमा सुपूर्द केला आहे. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्ज्वला लांडगे या पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असल्यामुळे, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजीनामा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लिंबाजी पाटील, कोठावळे आणि कचरे यांनी शनिवारी राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे सादर केला आहे. सभापती उज्ज्वला लांडगे सोमवारी राजीनामा देणार होत्या. मात्र, त्यांनीही नेत्यांना हुलकावणी दिली. या पार्श्वभूमीवर मनीषा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे नेत्यांची पंचाईत झाल्याने, अखेर त्यांचे पती तानाजी पाटील यांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पाटील यांनी पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाची संधी देण्याचा शब्द दिला होता. नेत्यांनी हा शब्द पाळावा, असे तानाजी पाटील यांनी सांगितले होते. सोमवारी सायंकाळीही याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि तानाजी पाटील यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त होते. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. याबाबत जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते ‘नॉट रिचेबल’ होते. (प्रतिनिधी)पदाधिकारी निवडी रखडणारपक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिल्यानंतर पदाधिकारी निवडीत संधी मिळण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांमार्फत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. सभापतींनी राजीनामा सादर केला नसल्याने इच्छुकांत अस्वस्थता आहे.