शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

जकात, एलबीटी दोन्ही नकोच!

By admin | Updated: June 14, 2014 01:34 IST

सांगलीत व्यापारी आक्रमक : शेंडी लावण्याचा उद्योग थांबवा !

सांगली : राज्यात व्हॅट लागू करताना इतर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी हमी शासनाने दिली होती, पण आज व्हॅटसोबतच एलबीटी, जकातीचा बोजा व्यापारी, उद्योजकांवर टाकला आहे. शासनाने आम्हाला शेंडी लावण्याचा उद्योग बंद करावा, अशा संतप्त भावना आज, शुक्रवारी महापालिकेत झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त झाल्या. जकात, एलबीटी, रहदारी असा कोणताही कर नको, या भूमिकेवर व्यापारी ठाम राहिले. महापौर कांचन कांबळे, गटनेते किशोर जामदार यांनी, महापालिकेचे सर्व नगरसेवक व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या भावनांचा विचार करून सर्वसमावेशक अहवाल शासनाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून एलबीटीसाठी पर्याय सुचविण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या सभागृहात शहरातील सर्व व्यापारी व उद्योजकांच्या संघटनांशी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. सुरुवातीला आयुक्त अजिज कारचे यांनी प्रशासनाची भूमिका व मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील मांडला. व्यापाऱ्यांनी शासनाशी सुरू असलेल्या भांडणाला महापालिका प्रशासनाचा विरोध नाही, पण एलबीटीची वसुली कमी होत असल्याने महापालिकेची नाचक्की होत आहे. व्यापाऱ्यांनी आंदोलन करू नये, असा आमचा हेतू नाही, पण नागरिकांना सुविधा देण्यासाठी एलबीटी भरून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. एलबीटी वसुलीबाबत महापालिकेने आक्रमक भूमिका घेतलेली नाही, हे सत्य आहे. पण शहरातील व्यापारी जकातही नको आणि एलबीटीही नको, या भूमिकेवर ठाम आहेत. व्यापाऱ्यांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. कोणाची स्वायत्तता धोक्यात आणण्याची इच्छा नाही, पण करप्रणाली सुटसुटीत हवी. व्यापाऱ्यांनी एलबीटीला पर्याय म्हणून व्हॅटमध्ये सरचार्ज लागू करण्याची शिफारस केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला पर्याय राज्यातील ८० टक्के महापालिकांनी फेटाळलेला आहे. राज्यात व्हॅट लागू करताना कोणताही कर लावणार नाही, याची हमी दिली होती, पण त्यानंतरही अनेक कर लावले गेले. शासनाने आता व्यापारी, उद्योजकांना शेंडी लावण्याचे बंद करावे. एलबीटीवर चर्चेचे गुऱ्हाळ फार झाले. कराच्या जाचामुळे अनेक व्यापारी, उद्योजकांनी शहर सोडले आहे. कर भरूनही शहरातील नागरिकांना ड्रेनेज, पाणी, रस्ते अशा कोणत्या सुविधा देता? कर भरण्यास व्यापाऱ्यांचा विरोध नाही, पण एकच कर असावा, अशी भूमिका व्यापारी प्रतिनिधींनी मांडली. गटनेते किशोर जामदार म्हणाले की, २००७ मध्ये जकातविरोधी आंदोलनात महापालिका व्यापाऱ्यांशी पाठीशी होती. जकात नको म्हणणारी राज्यातील ही पहिली महापालिका आहे. सत्ताधारी गटाचे नेते मदन पाटील यांनी वेळोवेळी व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. महापौर कांचन कांबळे यांनी मुंबईतील बैठकीत जकात, एलबीटी नको, अनुदान द्या, अशी मागणी केली आहे. व्यापाऱ्यांच्या या भावनांचा विचार करून मुख्यमंत्र्यांना सर्वसमावेश अहवाल पाठविला जाईल.