शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
4
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
5
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
6
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
7
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
8
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
9
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
10
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
11
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
12
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
13
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
14
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
15
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
16
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
17
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
18
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

कोरोनाला रोखण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. सुमनताई पाटील, ...

जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. शहरी व ग्रामीण आठवडी बाजारांवर निर्बंधाचे संकेत दिले. जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत ते बोलत होते.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी उपस्थित होते. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरपंचांची ऑनलाइन कार्यशाळा झाली. त्यामध्ये १७२ सरपंच सहभागी झाले. चौदा प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सुविधांच्या रुग्णवाहिका जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. ते म्हणाले, कोरोना वाढत असल्याने पुन्हा उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आठवडा बाजारांसह गर्दीची ठिकाणे बंद करावी लागतील. दररोज २०० हून अधिक रुग्ण सापडत असल्याने गाफील राहून चालणार नाही. कोरोना काळात आरोग्याचे महत्त्व लक्षात आले. महाराष्ट्रातील तिसरी कोरोना चाचणी प्रयोगशाळा मिरजेत सुरू झाली. अंदाजपत्रकात सांगलीसाठी आणखी एक रुग्णालय मंजूर झाले. आता प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणार आहोत. आणखी १६ रुग्णवाहिका देऊ, त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देऊ.

डॉ. कदम म्हणाले, कोरोनाची दुसऱ्या लाटेसारखी स्थिती आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायला हवे. स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यायला हवा. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळावी लागेल. गावोगावी सरपंचांनी यासाठी पुढाकार घ्यावा. प्रसंगी वाकडेपणाही घ्यावा. काशिलिंगवाडी (ता. जत) येथे लग्नसोहळ्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला, असे प्रसंग टाळण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा.

यावेळी डुडी यांनी कोरोना उपायांचा आढावा घेतला. कार्यक्रमाला आ. सुमनताई पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, माजी अध्यक्षा मालन मोहिते, सदस्य सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, संजय पाटील, सरिता कोरबू, जयश्री पाटील, संपतराव देशमुख, मनोज मुंडगनूर, अरुण बालटे, जितेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, आरोग्याधिकारी मिलिंद पोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, राहुल गावडे आदी उपस्थित होते.

चौकट

या गावांना मिळाल्या रुग्णवाहिका

मांगले, रांजणी, भिलवडी, देशिंग, कामेरी, खंडेराजुरी, शिरशी, येडेमच्छिंद्र, आटपाडी, कोंतेवबोबलाद, वळसंग, आगळगाव, बिळूर आणि येळवी या गावांना जयंत पाटील व डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या.