शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कोरोनाला रोखण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. सुमनताई पाटील, ...

जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. शहरी व ग्रामीण आठवडी बाजारांवर निर्बंधाचे संकेत दिले. जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत ते बोलत होते.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी उपस्थित होते. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरपंचांची ऑनलाइन कार्यशाळा झाली. त्यामध्ये १७२ सरपंच सहभागी झाले. चौदा प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सुविधांच्या रुग्णवाहिका जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. ते म्हणाले, कोरोना वाढत असल्याने पुन्हा उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आठवडा बाजारांसह गर्दीची ठिकाणे बंद करावी लागतील. दररोज २०० हून अधिक रुग्ण सापडत असल्याने गाफील राहून चालणार नाही. कोरोना काळात आरोग्याचे महत्त्व लक्षात आले. महाराष्ट्रातील तिसरी कोरोना चाचणी प्रयोगशाळा मिरजेत सुरू झाली. अंदाजपत्रकात सांगलीसाठी आणखी एक रुग्णालय मंजूर झाले. आता प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणार आहोत. आणखी १६ रुग्णवाहिका देऊ, त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देऊ.

डॉ. कदम म्हणाले, कोरोनाची दुसऱ्या लाटेसारखी स्थिती आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायला हवे. स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यायला हवा. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळावी लागेल. गावोगावी सरपंचांनी यासाठी पुढाकार घ्यावा. प्रसंगी वाकडेपणाही घ्यावा. काशिलिंगवाडी (ता. जत) येथे लग्नसोहळ्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला, असे प्रसंग टाळण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा.

यावेळी डुडी यांनी कोरोना उपायांचा आढावा घेतला. कार्यक्रमाला आ. सुमनताई पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, माजी अध्यक्षा मालन मोहिते, सदस्य सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, संजय पाटील, सरिता कोरबू, जयश्री पाटील, संपतराव देशमुख, मनोज मुंडगनूर, अरुण बालटे, जितेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, आरोग्याधिकारी मिलिंद पोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, राहुल गावडे आदी उपस्थित होते.

चौकट

या गावांना मिळाल्या रुग्णवाहिका

मांगले, रांजणी, भिलवडी, देशिंग, कामेरी, खंडेराजुरी, शिरशी, येडेमच्छिंद्र, आटपाडी, कोंतेवबोबलाद, वळसंग, आगळगाव, बिळूर आणि येळवी या गावांना जयंत पाटील व डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या.