शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

आष्ट्यातील मिळकतीच्या खरेदी-विक्रीत अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा येथील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरमधील गट क्रमांक ४, ६, ९ मधील जमिनींचे खरेदी-विक्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा येथील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरमधील गट क्रमांक ४, ६, ९ मधील जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार मागील अनेक वर्षांपासून होत नाहीत. जुन्या नियमांचा याला अडथळा ठरत आहे. नवीन वर्षात तरी पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

येथील दत्त वसाहत, गांधीनगर व साईनगरमधील नागरिकांनी संबंधित मालकांकडून प्लॉटची खरेदी केली. काही प्लॉटधारकांच्या नावावर नोंद झाली आहे; तर काहींच्या अद्याप झालेली नाही. काही नागरिकांनी प्लॉट घेऊन नियमितीकरण, एन. ए. केले. या प्लॉट धारकांच्या नावे सात-बाराही झालेला आहे. पालिकेने बांधकाम परवानगी दिली आहे. लोकांनी घरेही बांधली. या नागरिकांना पालिकेच्या वतीने वीज, पाणी नियमित मिळत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी नागरिक भरत आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून जुन्या अटी व शर्ती व तुकडेबंदीचा भंग केल्याच्या कारणावरून या परिसरातील नागरिकांचे प्लॉट खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. बँकेकडून कर्जही उपलब्ध होत नाही. तसेच सात-बारावर वारसांची नावेही नोंद होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना प्लॉट असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे..

चौकट

वर्षभरानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

नागरिकांनी पालकमंत्री जयंत पाटील यांची गतवर्षी भेट घेतली होती. यानंतर परिसरातील प्रमुख नागरिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बैठकही झाली. मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न लवकर मार्गी लावण्याबाबत सूचना केली. मात्र वर्ष संपत आले तरी याबाबत अद्याप हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे नूतन वर्षात तरी दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगरच्या नागरिकांचा प्रश्न सुटणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.