शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण अबाधित ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST

संख : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केले आहे, ते आरक्षण कायम ठेवले पाहिजे. यासाठी केंद्र ...

संख : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केले आहे, ते आरक्षण कायम ठेवले पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी पत्रकार परिषदेत केली.

माळी पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी मंडल आयोगाने १९३१ ची जनगणना जनसंख्येच्या आधारानुसार आरक्षण दिले आहे. त्यामुळे न्यायालयाने जिल्हानिहाय जनगणना उपलब्ध नसल्याने आरक्षण रद्द केले आहे. ज्या सरकारची जनगणना करण्याची जबाबदारी आहे. ती पार पाडली पाहिजे.

डॉ. कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार निवाड्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण देताना सर्व पडताळणी केली आहे. सरकारने आरक्षणासाठी इंप्रिकल डेटा उपलब्ध करून आरक्षण द्यावे.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण कोर्टाने नाकारले नाही. आरक्षणाचा कायदेशीर व तांत्रिक बाबी पूर्ण करून आरक्षण द्यावे, असा निकाल दिला आहे. ओबीसीच्या जनरेट्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग असताना दि. २ ऑक्टोबर २०११ ला जनगणनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले; पण आकडेवारी जाहीर केली नाही. न्यायालयाने वेळोवेळी जातीगत जनगणना करण्यासाठी सांगूनही सरकारने जनगणना केली नाही.

केंद्र सरकारने वेगळी जनगणना करण्यापेक्षा अनुसूचित जाती व जमाती प्रमाणे फक्त एक रखाना वाढवून जनगणना केली तर सरकारचा वेळ आणि पैसा वाचेल; परंतु सरकारला ओबीसी जनसंख्येची भीती का वाटते? राज्य आणि केंद्र सरकारने जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही. केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने मिळून आपआपल्या कक्षेतील जबाबदारीने निर्णय घेऊन पूर्तता केली पाहिजे.