शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

ओबीसी मंत्र्यांनी समाजा-समाजात भांडणे लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:25 IST

सांगली : विद्यमान सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम केले, असा आरोप भाजपच्या ओबीसी मोर्चाचे ...

सांगली : विद्यमान सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम केले, असा आरोप भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केला.

भाजपच्या सांगली जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे गणेशनगर येथील रोटरीच्या सभागृहात ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी व नूतन मंडल कार्यकारिणी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर यांनी करताना मेळाव्याचा उद्देश विषद करून आगामी काळात ओबीसी मोर्चा आपले काम अधिक प्रभावीपणे करेल अशी ग्वाही दिली.

टिळेकर म्हणाले की, भाजप ओबीसी समाजाच्या नेहमीच पाठीशी राहिला आहे. १९५१ पासून आरक्षण मागत असताना काँग्रेसने त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले. मंडल आयोगाच्या शिफारसी काँग्रेस सरकारने दप्तरी ठेवल्या. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक म्हणजे ३८ आमदार ओबीसी आहेत. भाजप सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत महाआघाडी सरकारने न्यायालयात बाजू व्यवस्थित न मांडल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली. ११ एप्रिलला आम्ही फुले वाड्यातून ओबीसी हक्क परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंढे, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सुरू करणार आहोत.

आमदार पडळकर म्हणाले की, राज्यातील महाआघाडी सरकार विश्वासघाताने आलेले आहे. भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले. ओबीसी आणि मराठ्यांच्यात काहीजण भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती म्हणजे सरकारचे अपयश आहे.

यावेळी विलास काळेबाग, प्रकाश गधळे, धोंडीराम इंगवले, दीपक माने, राहुल माने, वीणा सोनवलकर, मिलिंद कोरे, परशुराम नागरगोजे, प्रमोद धायगुडे आदी उपस्थित होते.